‘आत्मपरीक्षण करणे चांगले होईल’, बांगलादेशच्या ‘त्या’ दाव्यावर भारताने फटकारले!

परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांचे प्रत्युत्तर 

‘आत्मपरीक्षण करणे चांगले होईल’, बांगलादेशच्या ‘त्या’ दाव्यावर भारताने फटकारले!

चितगाव हिल ट्रॅक्ट्समधील खागराछडी जिल्ह्यात झालेल्या अलीकडील हिंसाचारात नवी दिल्लीचा हात असल्याचा बांगलादेशच्या अंतरिम सरकारने केलेला आरोप भारताने शुक्रवारी (३ ऑक्टोबर) जोरदारपणे फेटाळून लावला आणि तो “खोटा आणि निराधार” असल्याचे म्हटले. बांगलादेशचे गृह सल्लागार जहांगीर आलम चौधरी यांच्या वक्तव्यावरील प्रश्नाला उत्तर देताना, परराष्ट्र मंत्रालयाचे (एमईए) प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, “आम्ही हे खोटे आणि निराधार आरोप स्पष्टपणे नाकारतो. बांगलादेशचे अंतरिम सरकार बांगलादेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास असमर्थ आहे आणि त्यांना नियमितपणे दोष दुसरीकडे ढकलण्याचा प्रयत्न करण्याची सवय आहे.”

“चितगाव डोंगराळ भागात अल्पसंख्याक समुदायांविरुद्ध हिंसाचार, जाळपोळ आणि जमीन बळकावणाऱ्या स्थानिक अतिरेक्यांच्या कृतींचे आत्मपरीक्षण करणे आणि गांभीर्याने चौकशी करणे चांगले होईल,” असे जयस्वाल म्हणाले. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने सोमवारी आरोप केला आहे की काही गट देशाच्या चितगाव हिल ट्रॅक्टमधील खाग्राछरी जिल्ह्यात सांप्रदायिक अशांतता भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे ही वाचा : 

पीओकेमधील अशांतता ही पाकिस्तानच्या दडपशाही वृत्तीचा परिणाम!

“कफ सिरपमुळे मृत्यूंचा संबंध अमान्य, कोणतेही दूषित पदार्थ आढळले नाहीत”

चेंगराचेंगरीनंतर पक्षप्रमुख विजय घटनास्थळावरून पळून गेले!

प्रिय मित्र मोदींना भेटण्यासाठी उत्सुक; भारत दौऱ्याबद्दल पुतिन काय म्हणाले?

गेल्या आठवड्यात एका आदिवासी मुलीवर कथित सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटनेनंतर, रविवारी बांगलादेशात आदिवासी जमाती आणि बंगाली स्थायिकांमध्ये तणाव निर्माण झाला. निषेधाच्या रूपात उसळलेल्या हिंसाचारात किमान तीन जण ठार, तर डझनभर लोक जखमी झाले. बांगलादेशचे गृह सल्लागार जहांगीर आलम चौधरी यांनी या हिंसाचाराचा संबंध पदच्युत पंतप्रधान शेख हसीना आणि भारताशी जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी आपल्या दाव्यांना कोणतेही ठोस पुरावे दिले नाहीत.

Exit mobile version