“… म्हणून दुबई एअर शोमध्ये अंतिम प्रात्यक्षिक करणार नाही!” अमेरिकन पायलट काय म्हणाले?

भारतीय हवाई दलाच्या पायलटचा मृत्यू झाल्यानंतरही कार्यक्रम सुरू ठेवण्याचा आयोजकांचा निर्णय

“… म्हणून दुबई एअर शोमध्ये अंतिम प्रात्यक्षिक करणार नाही!” अमेरिकन पायलट काय म्हणाले?

गेल्या आठवड्यात झालेल्या तेजस विमान अपघातात भारतीय हवाई दलाच्या पायलटचा मृत्यू झाल्यानंतरही दुबई एअर शो २०२५ च्या आयोजकांनी हा कार्यक्रम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल युनायटेड स्टेट्स एअर फोर्स पायलट मेजर टेलर ‘फेमा’ हिस्टर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये, एफ- १६ व्हायपर प्रात्यक्षिक टीम कमांडर हिस्टर यांनी जाहीर केले की, त्यांच्या टीमने “आयएएफ पायलट, त्यांचे सहकारी आणि कुटुंबाच्या सन्मानार्थ” त्यांचा अंतिम कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

तेजस लढाऊ विमानाचा अपघात झाला तरी, एअर शो सुरूच राहील, अशी माहिती युनायटेड स्टेट्स एअर फोर्स पायलट मेजर टेलर ‘फेमा’ हिस्टर यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “मी अपघातानंतर एक- दोन तासांनी शो साइटला भेट दिली तेव्हा वाटले की, ते रिकामे असेल, खाली असेल किंवा बंद असेल. पण, ते नव्हते,” असे हिस्टर यांनी सांगितले.

शुक्रवारी विंग कमांडर नमांश सियाल यांचे तेजस लढाऊ विमान, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) द्वारे स्वदेशी बनावटीचे बहु-भूमिका असलेले हलके लढाऊ विमान, अल मख्तूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका सरावादरम्यान कोसळले. यात सियाल यांचे निधन झाले.

“दुबई एअर शोच्या शेवटच्या दिवशी, तेजसमध्ये फायटर जेट अॅक्रोबॅटिक डेमो करताना भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर नमांश सियाल यांचा मृत्यू झाला. आमची टीम स्वतःचे विमान उडवण्यासाठी विमान तयार करत होती. यानंतर अपघाताची माहिती मिळाली. आयोजकांनी उड्डाण वेळापत्रक सुरू ठेवण्याचा धक्कादायक निर्णय घेतला असला तरी, आमच्या टीमने इतर काही जणांसह अपघातात निधन झालेले पायलट, त्यांचे सहकारी आणि कुटुंबाचा आदर म्हणून अंतिम प्रात्यक्षिक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे हिस्टर यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

हे ही वाचा: 

“अरुणाचल प्रदेश चीनचा भाग” म्हणत शांघाय विमानतळावर भारतीय महिलेला रोखले

५३ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणारे न्यायमूर्ती सूर्य कांत कोण आहेत?

पंकजा मुंडेंचा स्वीय सहाय्यक अनंत गर्जेला अटक

“सिंध भारतात परत येऊ शकतो, सीमा बदलू शकतात”

रविवारी, सियाल यांचे पार्थिव तमिळनाडूतील सुलूर हवाई दल तळावर आणण्यात आले. लष्करी सन्मानाने त्यांना मानवंदना देण्यात आली. नंतर, त्यांना हिमाचल प्रदेशला विमानाने नेण्यात आले आणि सशस्त्र दल आणि नागरी वाहनांच्या ताफ्यासह फुलांनी सजवलेल्या लष्करी ट्रकमधून त्यांच्या मूळ गावी पटियालकर येथे नेण्यात आले. कांगडा जिल्ह्यात त्यांच्या पत्नी, विंग कमांडर अफशान आणि त्यांच्या सहा वर्षांच्या मुलीने त्यांना अंतिम निरोप दिला.

Exit mobile version