पद्म पुरस्काराने गौरविलेल्या मणी यांना हिंदू दहशतवादाच्या षडयंत्रात गोवले गेले!

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते केला गेला सन्मान

पद्म पुरस्काराने गौरविलेल्या मणी यांना हिंदू दहशतवादाच्या षडयंत्रात गोवले गेले!

केंद्रीय गृह मंत्रालयाचे माजी अधिकारी आर.व्ही.एस. मणी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने आर.व्ही.एस. मणी यांचा भूतकाळ ताजा झाला आहे. त्यांना नागरी सेवेमधील उत्कृष्ट योगदानासाठी हा सन्मान देण्यात आला. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर प्रणालीच्या आत राहूनही त्यांनी आपला आवाज बुलंद केला, हा त्यांच्या धैर्याचा गौरव मानला जातो.

आर.व्ही.एस. मणी कोण आहेत?

आर.व्ही.एस. मणी हे माजी आयएएस अधिकारी आहेत. ते केंद्रीय गृह मंत्रालयाचे माजी अवर सचिव होते. अंतर्गत सुरक्षेच्या क्षेत्रात त्यांनी देशासमोरील सुरक्षाविषयक आव्हानांच्या निराकरणात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी मँचेस्टर विद्यापीठातून मानव संसाधन विकास विषयात एम.एस्सी. आणि दिल्ली विद्यापीठातून येथून एलएलबी पदवी प्राप्त केली आहे. ते संस्कृत भाषेचे जाणकार असून त्यांना भगवद्गीता आणि वैदिक ग्रंथांचे चांगले ज्ञान आहे.

२००६ ते २०१० या कालावधीत ते गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सुरक्षा विभागात कार्यरत होते. ते एका खासगी विद्यापीठात व्हिजिटिंग प्राध्यापकही राहिले आहेत. राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी पाच पुस्तके लिहिली आहेत.

हे ही वाचा:

“राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला शुभेंदू अधिकारींनी खूप मदत केली”

अरुणाचलमध्ये पावसाचा कहर

इराणी तेलाचे दरवाजे खुले

अदानींचा ऊर्जा क्षेत्रात मेगा विस्तार

‘भगवा दहशतवाद’ संकल्पनेला विरोध

आर.व्ही.एस. मणी यांनी तथाकथित ‘भगवा दहशतवाद’ ही संकल्पना फेटाळून लावत ती एक राजकीय कटकारस्थान असल्याचा दावा केला आहे. त्यांनी आपल्या द मिथ ऑफ हिंदू टेरर या पुस्तकात २००६ ते २०१० दरम्यान गृह मंत्रालयातील अनुभव आणि राजकीय हस्तक्षेपाबाबत तपशीलवार माहिती दिली आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, २००९ मध्ये गृह मंत्रालयातील राजकीय नेतृत्वाने त्यांच्यावर ‘भगवा दहशतवाद’ कथानकाला बळ देणाऱ्या दुसऱ्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव आणला होता. त्यांनी असा आरोप केला की हिंदूंना बदनाम करण्यासाठी आणि त्यांना दहशतवादी ठरवण्यासाठी एक नियोजित राजकीय प्रयत्न करण्यात आला.

इशरत जहाँ प्रकरणाबाबत दावा

मणी यांनी असा दावा केला आहे की यूपीए सरकारच्या काळात इशरत जहाँ प्रकरणात दोन वेगवेगळी प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली होती. त्यांच्या मते, पहिल्या प्रतिज्ञापत्रात इशरत जहाँचा संबंध लष्कर ए तैय्यबाशी असल्याचे नमूद होते. नंतर सादर केलेल्या दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती वगळण्यात आली होती. मणी यांनी असा आरोप केला की, त्यांना राजकीय दबावाखाली या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करावी लागली.

मणी यांची पुस्तके

आर.व्ही.एस. मणी यांनी खालील पुस्तके लिहिली आहेत:

द मिथ ऑफ हिंदू टेरर

डिसेप्शन

भगवा आतंक का षडयंत्र

दलाल

Exit mobile version