बिहारमध्ये रविवारीपासून सरकार स्थापनेची प्रक्रिया वेगाने सुरू होणार असून, शपथविधी सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाचा विचार करून १९ किंवा २० नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे.
आज निवडणूक आयोग १८व्या बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांना सादर करणार आहे. त्यानंतर नवीन विधानसभा स्थापनेची अधिसूचना जाहीर होईल. यामुळे निवडणूक काळात लागू असलेली आचारसंहिता अधिकृतपणे संपुष्टात येईल.
हे ही वाचा:
….तर बीबीसीवर ५ अब्ज डॉलर्सपर्यंत खटला
कोणता नियम भारताच्या डिजिटल इकोसिस्टमला मजबूत करणार ?
१२ राज्यात मतदारयादीचे SIR सुरू
चमत्कारी झाडावर लागतात चार प्रकारचे आंबे
सोमवारी मुख्यमंत्री नीतीश कुमार मंत्रिमंडळाची बैठक घेऊन १७व्या विधानसभा विसर्जनास मंजुरी देणार Urdu. त्यानंतर ते राज्यपालांची भेट घेऊन आपला राजीनामा सादर करतील, अशी अपेक्षा आहे.
नीतीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर एनडीएतील घटक पक्ष त्यांच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकांमध्ये पुढील नेत्याची निवड करतील. निवडलेले नेते राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापनेचा दावा करतील.
दरम्यान, पटण्याच्या गांधी मैदानावर शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
