मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) इराणला कठोर संदेश देत “शुद्धीवर या” आणि शेजारी देशांशी तर्कसंगत व जबाबदारीने वागा, असे म्हटले आहे. अन्यथा एकाकीपणा आणि संघर्षाचा विस्तार आणखी वाढेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
यूएईचे राष्ट्राध्यक्षांचे वरिष्ठ राजनैतिक सल्लागार अन्वर गर्गश यांनी सांगितले की, आखाती देशांविरुद्ध इराणचा हल्ला आपल्या उद्दिष्टांपासून भरकटला असून या संवेदनशील काळात तेहरान आणखी वेगळे पडले आहे. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी लिहिले, “तुमचे युद्ध तुमच्या शेजाऱ्यांशी नाही. वाढती आक्रमकता त्या कथानकाला बळ देते, ज्यामध्ये इराणला प्रादेशिक अस्थिरतेचे प्रमुख कारण आणि त्याची क्षेपणास्त्र नीती कायमस्वरूपी धोका मानली जाते. शुद्धीवर या आणि शेजाऱ्यांशी जबाबदारीने व समजुतीने वागा.”
तणावाच्या पार्श्वभूमीवर यूएईने दावा केला आहे की, त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेने देशाच्या दिशेने डागण्यात आलेल्या इराणी क्षेपणास्त्र आणि ड्रोन यशस्वीपणे पाडले.
संयुक्त अरब अमिरातीच्या संरक्षण मंत्रालयानुसार, हल्ल्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण १३७ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि २०९ ड्रोन यूएईकडे डागण्यात आले. त्यापैकी १३२ क्षेपणास्त्रे नष्ट करण्यात आली, तर ५ समुद्रात पडली. २०९ ड्रोनपैकी १९५ ड्रोन इंटरसेप्ट करण्यात आले, तर १४ ड्रोन देशातील विविध भागांमध्ये आणि जलक्षेत्रात कोसळले, ज्यामुळे किरकोळ नुकसान झाले.
दुबई सरकारच्या मीडिया कार्यालयाने सांगितले की, हवाई संरक्षणाने पाडलेल्या ड्रोनचा अवशेष दुबईतील दोन घरांच्या अंगणात पडला, ज्यात दोन जण जखमी झाले. जखमींना आवश्यक वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. प्रशासनाने स्पष्ट केले की, अमिरातमध्ये ऐकू आलेले मोठे आवाज हे इंटरसेप्शन कारवाईचा परिणाम होते.
हे ही वाचा:
सर्वोच्च न्यायालयाची पश्चिम बंगाल सरकारला पुन्हा एकदा चपराक !
अजबच आहे! मोदींना शिव्या; खामेनींबद्दल दुःख
इराणने होर्मुज सामुद्रधुनी रोखली
नागपूर काटोल औद्योगिक परिसरात भीषण स्फोट
संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्याला राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्पष्ट उल्लंघन ठरवले. ही एक धोकादायक आणि उचकावणारी कृती असून ती प्रादेशिक स्थैर्य आणि लोकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारी आहे, असे मंत्रालयाने म्हटले. मंत्रालयाने नागरिकांना केवळ अधिकृत स्रोतांकडूनच माहिती घेण्याचे आणि अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. तसेच देशातील सुरक्षा यंत्रणा उच्च सतर्कतेवर असून कोणत्याही धोक्याला सामोरे जाण्यास पूर्णतः सज्ज असल्याचेही सांगितले.
शनिवारीही अन्वर गर्गाश यांनी स्पष्ट केले होते की, यूएईने युद्ध टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि संभाव्य धोक्यांबाबत आधीच इशारा दिला होता. “आमचे प्राधान्य यूएई, त्याचे स्थैर्य, सुरक्षा आणि येथे राहणाऱ्या सर्वांची सुरक्षितता आहे. आमची अंतर्गत यंत्रणा पूर्ण तयारी आणि कार्यक्षमतेने काम करत आहे,” असे त्यांनी नमूद केले.
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर यूएईने स्पष्ट केले आहे की, आपल्या सार्वभौमत्व, नागरिक आणि रहिवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
