मित्रांनो, जेव्हा दोन देशांमध्ये युद्ध सुरू होते, तेव्हा आपल्याला वाटते की याचा परिणाम फक्त सीमेवरील सैनिकांवर किंवा तिथल्या नागरिकांवर होत आहे. पण हजारो किलोमीटर लांब रशिया आणि युक्रेनमध्ये पेटलेल्या युद्धाची झळ आज तुमच्या आणि माझ्या घरापर्यंत, किंबहुना आपल्या जेवणाच्या ताटापर्यंत पोहोचली आहे! आज आपण हॉटेलमध्ये गेल्यावर वाढलेले जेवणाचे बिल, गव्हाचे, तेलाचे भाव किंवा शेतकऱ्यांच्या खतांच्या वाढलेल्या किमती असोत… या सगळ्यामागे जागतिक राजकारण आणि हे महायुद्ध कारणीभूत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की, रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतातील शेती, व्यापार, निर्यात, आयात आणि भविष्यातील अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम झाला.
