‘इंडिगो’च्या गोंधळानंतर नव्या विमान कंपन्या सुरू करण्याचे सरकारकडून प्रयत्न

मंत्री राम मोहन नायडू यांनी दिली माहिती

‘इंडिगो’च्या गोंधळानंतर नव्या विमान कंपन्या सुरू करण्याचे सरकारकडून प्रयत्न

‘इंडिगो’च्या कामकाजातील गोंधळामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. या गोंधळानंतर विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी ‘इंडिगो’ला कठोर इशारा देताना म्हटले आहे की, सुधारित पायलट आणि क्रू रोस्टरिंग नियमांवर चर्चा करता येणार नाही. लोकसभेत बोलताना नायडू म्हणाले की, इंडिगोचे कामकाज सर्व विमानतळांवर स्थिर होत आहे. कोणतीही विमान कंपनी असो, कितीही मोठी असो, प्रवाशांना अशा अडचणी निर्माण करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

“इंडिगोच्या विमान सेवेतील अडथळे स्थिर होत असून कोणत्याही मोठ्या विमान कंपनीला, नियोजनातील अपयश, कायदेशीर तरतुदींचे पालन न करणे किंवा त्यांचे पालन न करणे याद्वारे प्रवाशांना असा त्रास देण्याची परवानगी दिली जाणार नाही,” असा कठोर इशारा नायडू यांनी दिल आहे. मंगळवारी झालेल्या गोंधळामुळे दुसऱ्या आठवड्यात इंडिगोची जवळपास ५०० उड्डाणे रद्द करण्यात आली. तथापि, गेल्या आठवड्यापेक्षा सेवा रद्द होण्याचे प्रमाण खूपच कमी होते.

विमानतळांवर गोंधळाचे दृश्ये पाहायला मिळत असताना, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) हस्तक्षेप करून इंडिगोला नवीन फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशन (FDTL) नियमांनुसार वैमानिकांसाठी रात्रीच्या ड्यूटी नियमांमधून तात्पुरती सूट दिली आहे. तथापि, या निर्णयावर व्यापक टीका झाली. केंद्र सरकारवर झुकल्याचाही आरोप केला.

हे ही वाचा:

भारतीय नागरिक होण्यापूर्वी मतदार बनल्याचा आरोप; सोनिया गांधींना नोटीस

पाकिस्तानच्या कटोऱ्यात जागतिक नाणेनिधीकडून १.२ अब्ज डॉलर

गोव्यातील आगप्रकरणातील आरोपी मालक थायलंडला पळाले

अमेरिकेने रद्द केले ८५ हजार व्हिसा !

विमान वाहतूक मंत्र्यांनी सांगितले की परतफेड, सामानाचा शोध आणि प्रवाशांना आधार देण्याचे उपाय मंत्रालयाच्या देखरेखीखाली आहेत आणि सविस्तर चौकशी केली जात आहे. त्यांनी संसदेत माहिती दिली की विमान कंपनीने आधीच ७५० कोटी रुपयांचे परतफेड प्रक्रिया केली आहे. इंडिगो संकटामुळे जी परिस्थिती निर्माण होण्याचे धोके उघड झाल्यानंतर सरकार भारतात नवीन विमान कंपन्या सुरू करण्यासाठी आणि त्यांचे कामकाज सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे हे नायडू यांनी अधोरेखित केले . इंडिगोचा देशांतर्गत बाजारपेठेत ६५% वाटा आहे, तर एअर इंडियाचा बाजारातील वाटा २७% आहे.

Exit mobile version