तेजस्वी यादव यांची पत्नी मतदार कशी झाली?

तेजस्वी यादव यांची पत्नी मतदार कशी झाली?

बिहारमध्ये मतदार यादीवरून सुरू असलेल्या गोंधळात केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी तेजस्वी यादव यांच्यावर मोठा आरोप केला आहे. मंगळवारी पाटण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी तेजस्वी यादव यांच्या पत्नीचं नाव मतदार यादीत समाविष्ट कसं झालं, यावर प्रश्न उपस्थित केला. “राजश्री मतदार कशा झाल्या? याची चौकशी झाली पाहिजे,” असं त्यांनी म्हटलं. गिरिराज सिंह म्हणाले, “तेजस्वी यादव स्वतःला समाजवादी म्हणवतात, पण हा कोणता प्रकारचा ढोंग आहे? त्यांनी आपल्या पत्नीचं नाव का बदललं? जर त्या ख्रिश्चन असतील, तर त्यात चुकीचं काय? ख्रिश्चन असणं गुन्हा आहे का?”

यावेळी गिरिराज सिंह यांनी मतदार यादीत नावाच्या समावेशावर चौकशीची मागणी केली. ते म्हणाले, “तेजस्वी यादव यांच्या पत्नी मतदार कशा झाल्या? काय हे नागरिकत्व प्रमाणपत्राच्या आधारे झालं आहे? मतदार यादीवरून विरोधकांनी केलेल्या आरोपांवर बोलताना त्यांनी म्हटलं, “तेजस्वी यादव आधार कार्डावर प्रश्न उपस्थित करत आहेत, पण आधार कार्डवर स्पष्ट लिहिलं असतं की ते नागरिकत्वाचं प्रमाण नाही. हे समजून घ्यावं लागेल की फक्त भारतीय नागरिकच मतदार होऊ शकतो. मग घाबरतंय कोणाला? काय घुसखोर भारताचे नागरिक होऊ शकतात?

हेही वाचा..

काँग्रेसने नेहमीच आदिवासी समाजाचा अपमान केला

हिंदी-मराठी वादावर उदित नारायण यांनी काय केले भाष्य

‘लठ्ठपणा’च्या विळख्यात आहेत चिमुरडी

मोहरम मिरवणुकीत ‘हिंदू राष्ट्र’चा बॅनर जाळला, चार मुस्लिमांना अटक!

गिरिराज सिंह यांनी आरोप केला, “विरोधक बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नागरिकांकडून मतदान करवू इच्छित आहेत.” त्यांनी विचारलं, “मी विरोधकांना विचारू इच्छितो की रोहिंग्यांना भारताचं नागरिकत्व मिळायला हवं का? केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले, “राहुल गांधी ओरडोत की तेजस्वी यादव ओरडोत, हे काम खूप आधीच झालं पाहिजे होतं. बिहारमध्ये दर १० वर्षांनी निवडणूक आयोगाने मतदार यादीचं विशेष सघन पुनरीक्षण केलं पाहिजे. शेवटी त्यांनी असंही सांगितलं की, “भारतीय मुस्लिम जगात सर्वात सुरक्षित आहेत. पण जे लोक घुसखोरांना संरक्षण देतात, ते देशाविरुद्ध गद्दारी करत आहेत.”

Exit mobile version