रोहित-कोहलीनंतरचा तारणहार!

पार्थिव म्हणतो, “केएल राहुलवर आता संपूर्ण टीमचा भरोसा”

रोहित-कोहलीनंतरचा तारणहार!

कधी काळी ड्रेसिंग रूमच्या कोपऱ्यात शांत बसलेला, आपल्या खेळात हरवलेला मुलगा… आज रोहित आणि विराट सारख्या दिग्गजांच्या संन्यासानंतर भारतीय फलंदाजीचा खांब बनलाय — केएल राहुल!
आणि हेच पार्थिव पटेलनं सांगितलं — “राहुलवर आता जबाबदारी पर्वताएवढी आहे… आणि हा मुलगा ती हसत-खेळत उचलतोय!”

पार्थिवनं जिओहॉटस्टारला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं,

“केएल राहुल सध्या ज्या जबाबदारीनं खेळतोय, ते पाहून मन भारावून जातं. रोहित-कोहलीनंतर भारतीय क्रिकेटला नवा कणा हवा होता — आणि तो राहुलच्या रूपानं मिळालाय. तो स्पिनर्सना वेळ देतो, पायांची हालचाल अप्रतिम ठेवतो, आणि चेंडू शेवटपर्यंत डोळ्यांनी पाहतो — हीच त्याची खासियत आहे.”

पार्थिव पुढं म्हणतो,

“राहुल सध्या टेस्टमध्ये 36 च्या सरासरीने धावा करत असला, तरी तो या आकड्यांपेक्षा खूप मोठा खेळाडू आहे. त्याचं बॅटिंग तंत्र, संयम आणि टाइमिंग हा वेगळ्या दर्जाचा वर्ग आहे. तो आता परिपक्व झालाय — सुरुवातीला वेळ घेतो, खेळाचं वाचन करतो, आणि मग योग्य क्षणी चेंडूला फटकारतो. हीच त्याची खास गती आहे.”

वेस्ट इंडिजविरुद्ध अहमदाबादमध्ये खेळलेल्या पहिल्या टेस्टमध्ये राहुलनं शतक झळकावलं होतं — 100 धावांची झळाळती खेळी.
तर इंग्लंड दौऱ्यावर त्याने 532 धावा ठोकल्या — दोन शतकं, दोन अर्धशतकं, आणि आत्मविश्वासानं भरलेला चेहरा.

आता रोहितच्या संन्यासानंतर, राहुलची ओपनिंगची जागा ठाम झाली आहे. सलामीचा नवा सेनापती म्हणून तो भारतासाठी स्थिरतेचा आधार बनलाय.
६४ टेस्टमध्ये ११ शतकं आणि १९ अर्धशतकं३,८८९ धावा — आकडे सांगतात की राहुल आता फक्त फलंदाज नाही, तर पुढील दशकाचा आधारस्तंभ आहे.

“राहुलच्या बॅटमधून निघणाऱ्या धावांचा आवाज म्हणजे भारतीय ड्रेसिंग रूमचं नवं हृदयस्पंदन,” — असं म्हणावंसं वाटतं!

Exit mobile version