“पंतप्रधान मोदी बिहारला आले की महाआघाडीचे नेते थरथर कापतात”

'पिंडदान' वक्तव्यावर भाजपाचा पलटवार

“पंतप्रधान मोदी बिहारला आले की महाआघाडीचे नेते थरथर कापतात”

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (२२ ऑगस्ट) बिहारच्या दौऱ्यावर असताना, त्यावर RJD प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी ट्विट करत “पंतप्रधान पिंडदानासाठी बिहारमध्ये येत आहेत” असे वक्तव्य केले. या वादग्रस्त ट्विटवर भाजपकडून जोरदार प्रतिक्रिया दिली गेली असून, शाहनवाज हुसैन यांनी लालू यादव यांच्यावर “अशोभनीय आणि भयग्रस्तपणाचे” आरोप केले आहेत.

भाजप नेते शाहनवाज हुसैन म्हणाले, लालू यादव यांनी केलेले वक्तव्य अत्यंत अशोभनीय आहे. त्यातून स्पष्ट दिसतं की ते किती घाबरले आहेत. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये येतात, तेव्हा महागठबंधनचे सर्व नेते थरथरतात.ते पुढे म्हणाले, “पंतप्रधानांच्या दौऱ्यावर ‘पिंडदान’सारखी भाषा वापरणं ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. पण या निवडणुकीत बिहारची जनता महागठबंधनचं पिंडदान करणार आहे. NDA ला २०० पेक्षा जास्त जागा मिळणार आहेत.”

दरम्यान, लालू यादव यांनी पंतप्रधान मोदींच्या बिहार दौऱ्यावर टीका करत एक ट्विट केलं होत, ज्यात त्यांनी ‘पिंडदानासाठी आलेत’ असे म्हटले. यावरून राजकीय वातावरण तापले असून भाजपने ते “मर्यादेपलीकडचं आणि अवमानकारक” असल्याच म्हटले आहे.

हे ही वाचा : 

“लसीकरणानंतर भटक्या कुत्र्यांना मूळ भागातच सोडा”

संसद भवनात घुसखोरीची घटना: भिंत ओलांडून गरुड गेटपर्यंत पोहोचलेला आरोपी अटकेत!

“पंतप्रधानांचा दौरा: बिहारमध्ये १३,००० कोटींचे प्रकल्प, कोलकाता मेट्रोला नवे टप्पे”

“भारतावर दुप्पट कर लावण्याची अंतिम मुदत २७ ऑगस्टपर्यंतच; ट्रम्प वाढवणार नाहीत”

भाजप नेते शाहनवाज हुसेन म्हणतात, “पंतप्रधान बिहारला येत आहेत. हा त्यांचा राज्याचा ५३ वा दौरा आहे. पंतप्रधानांच्या आजच्या राज्य भेटीबद्दल लोकांमध्ये खूप आनंद आहे. संपूर्ण राज्य त्यांचे स्वागत करण्यास सज्ज आहे…”राहुल गांधींच्या ‘मतदार अधिकार यात्रे’बद्दल ते म्हणतात, “बिहारमध्ये राहुल गांधींच्या यात्रेला कोणताही प्रतिसाद नाही. त्यांच्या यात्रेला कोणताही प्रतिसाद नाही. फक्त निवडणुकीचे तिकीट हवे असलेले लोक त्यांच्याभोवती फिरत आहेत. बिहारच्या लोकांनी त्यांची यात्रा नाकारली आहे. निवडणूक आयोगाविरुद्ध ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहेत ते दुर्दैवी आहे.”

दरम्यान, बिहारमध्ये निवडणूक वातावरण तापत असताना, दोन्ही बाजूंनी प्रत्युत्तरात्मक राजकारण तेजीत आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर RJD आणि BJP यांच्यातील शब्दयुद्ध अधिक तीव्र झाले आहे.

 

Exit mobile version