पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात तमिळनाडूतील नागरकोइल येथील शिक्षिका गिरिजा अम्मा यांचा विशेष उल्लेख केला. त्यांच्या देशभक्तीच्या भावनेचे कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले की, त्यांचे कार्य प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “गेल्या महिन्यात मला एक अतिशय सुंदर अनुभव आला. त्याचा संबंध ‘मन की बात’शीही आहे. तमिळनाडूतील नागरकोइल येथे माझी एका शिक्षिकेशी भेट झाली. जवळपास तीन दशकांपूर्वीही मी त्यांना भेटलो होतो. मी गिरिजा अम्मांविषयी बोलत आहे.”
गिरिजा अम्मा सुमारे १५ शाळांचे संचालन करतात. त्यामध्ये जयगोपाल गरोडिया हिंदू विद्यालय ही शाळा विशेष प्रसिद्ध आहे. पंतप्रधानांनी सांगितले की, ‘मन की बात’ कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन गिरिजा अम्मांनी देशातील सैनिकांसाठी योगदान देण्याचा संकल्प केला. त्यांनी आपल्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले.
हे ही वाचा:
टाटा समूहाची गुंतवणूकदारांना मोठी भेट!
बांगलादेशातील रोहिंग्या शिबिरांमध्ये गळेकापू दहशतवाद
पुणे – गुवाहाटीच्या विमानात बॉम्बची चिठ्ठी
त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, प्रत्येकाने दररोज फक्त १ रुपया सैनिकांसाठी द्यावा. अशा प्रकारे एका विद्यार्थ्याकडून वर्षभरात ३६५ रुपये जमा झाले. हजारो विद्यार्थ्यांच्या छोट्या-छोट्या योगदानातून तब्बल ४० लाख रुपये जमा झाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “गिरिजा अम्मांनी या संपूर्ण रकमेचा धनादेश मला सुपूर्द केला. त्यांच्याशी संवाद साधताना मला जाणवले की मातृभूमीबद्दल त्यांचे समर्पण किती गहिरे आहे. यावेळी पंतप्रधानांनी हेही नमूद केले की, चेन्नईतील पहिल्या हिंदू विद्यालयाने नुकतीच आपली ५० वर्षे पूर्ण केली आहेत. शिक्षण आणि सांस्कृतिक मूल्यांच्या जतनासाठी या शाळा समूहाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
शेवटी पंतप्रधानांनी गिरिजा अम्मा, त्यांच्या शाळांशी संबंधित सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच सैनिकांसाठी केलेल्या या योगदानाचे कौतुक केले.
