१.७ कोटी शेतकऱ्यांना २४,००० कोटींच्या योजनेचा लाभ

१.७ कोटी शेतकऱ्यांना २४,००० कोटींच्या योजनेचा लाभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘प्रधानमंत्री कृषी धन-धान्य योजना’ च्या घोषणेमुळे देशातील १.७ कोटी शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी २४,००० कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी खर्च केले जातील, ज्याचा विशेष फायदा झारखंड आणि बिहार सारख्या राज्यांतील शेतकऱ्यांना होईल. या योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि ती ग्रामीण विकासासाठी मोठं पाऊल मानली जात आहे. झारखंडचे शेतकरी कुणाल साहदेव यांनी आयएएनएसशी संवाद साधताना सांगितले की, “या योजनेतून १.७ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार असून, झारखंडच्या शेतकऱ्यांमध्ये विशेष आनंद आहे.” त्यांनी सांगितले की, “२४,००० कोटींच्या या योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबुती मिळेल.

झारखंडचेच शंकर महतो नावाचे दुसरे शेतकरी म्हणाले की, “ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे आणि ग्रामीण भागातील विकासासाठी नवे दरवाजे उघडेल. शेतकरी रोमिन तिर्के म्हणाले की, “ही योजना ग्रामीण भागासाठी वरदान ठरेल आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील शेतकरी आशुतोष सिंह यांनी योजनेला शेतकऱ्यांसाठी ‘दुहेरी आनंदाचा क्षण’ म्हटले. ते म्हणाले, “रोहतास हे कृषीप्रधान जिल्हा आहे, त्यामुळे या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.”

हेही वाचा..

या दोन घटनांमध्ये समानसूत्र आहे का?

केजरीवाल सरकारने कोविड काळात केला घोटाळा

काँग्रेस विघटनवादी राजकारणात गुंतलेला

नोएडा देशातील सर्वात स्वच्छ शहर!

कृष्णा कुमार, रोहतासचेच दुसरे शेतकरी म्हणाले, “पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांसाठी २४,००० कोटींची योजना घेऊन आले आहेत, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आता शेतकऱ्यांना वेगवेगळ्या कार्यालयांत चकरा माराव्या लागणार नाहीत, सर्व कामे एका कार्यालयात होतील. ही योजना थेट लाभ देण्यासाठीच आहे.”

संतोष कुशवाहा नावाचे आणखी एक शेतकरी म्हणाले की, “मोदीजींनी आणलेली ही २४,००० कोटींची योजना शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ देणार नाही. शेतीशी संबंधित कोणतीही माहिती मिळवण्यासाठी शेतकरी आता आपल्या जिल्ह्यातीलच कृषी केंद्रात जाऊ शकतील. यासाठी मोदीजींचे मनःपूर्वक आभार! याची नोंद घ्यावी की केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना’ला बुधवारी अधिकृत मंजुरी दिली आहे. ही योजना पुढील सहा वर्षांपर्यंत चालणार आहे.

Exit mobile version