पाच देशांचा दौरा करून पंतप्रधान मोदी भारतात परतले! 

आठ दिवसांच्या दौऱ्यात भारतासोबत अनेक करार

पाच देशांचा दौरा करून पंतप्रधान मोदी भारतात परतले! 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच देशांचा दौरा संपला असून ते भारतात परतले आहेत. गुरुवारी (१० जुलै) सकाळी त्यांचे विमान पालम विमानतळावर उतरले. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आठ दिवसांच्या दौऱ्यात घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबिया या पाच देशांना भेट दिली. त्यांनी ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे झालेल्या १७ व्या ब्रिक्स शिखर परिषदेलाही उपस्थिती लावली.

आठ दिवसांच्या दौऱ्यातील ठळक मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी २ जुलै रोजी घाना येथे पोहोचले तेव्हा त्यांना घानाचा सर्वोच्च सन्मान मिळाला. पंतप्रधान मोदींना घानाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी घानाच्या संसदेला संबोधित केले. विशेष म्हणजे, तीन दशकांनंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानाने घानाला भेट दिली.

त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि भारत यांच्यात सहा करारांवर स्वाक्षऱ्या 
पंतप्रधान नरेंद्र मोदी घानाच्या यशस्वी दौऱ्यानंतर कॅरिबियन देश त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे पोहोचले. देशाची राजधानी पोर्ट ऑफ स्पेन येथे पोहोचल्यानंतर विमानतळावर पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या अध्यक्षा क्रिस्टीन कांगालू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार ‘द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद आणि टोबॅगो’ प्रदान केला. त्यांनी येथे संसदेला संबोधित केले. भारत आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो यांच्यात सहा महत्त्वाचे करार झाले आहेत. पंतप्रधान मोदी आणि त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांच्यातील बैठकीनंतर, दोन्ही देशांनी पायाभूत सुविधा विकास, औषधनिर्माण आणि संरक्षण यासारख्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शविली.

अर्जेंटिनामध्ये भव्य स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या परदेश दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात दक्षिण अमेरिकन देश अर्जेंटिना येथे पोहोचले. पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष मायले आणि या देशातील अनेक फुटबॉल खेळाडूंनाही भेटले. अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मायले यांनी राजधानी ब्यूनस आयर्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी एकत्र बैठक घेतली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही भारत-अर्जेंटिना राजनैतिक संबंधांची ७५ वर्षे आणि आमचे संबंध धोरणात्मक भागीदारीपर्यंत वाढवण्याची ५ वर्षे साजरी करत आहोत. आम्ही आमच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. पुढचा प्रवास आणखी आशादायक आहे यावर आम्ही सहमत आहोत.
ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी 
पंतप्रधान मोदी त्यांच्या परदेश दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात चार दिवसांसाठी ब्राझीलला गेले होते. त्यांनी रिओ डी जानेरो येथे झालेल्या १७ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत भाग घेतला. ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी म्हणाले – दहशतवाद आज मानवतेसाठी सर्वात गंभीर आव्हान बनला आहे. २० व्या शतकात स्थापन झालेल्या जागतिक संस्था २१ व्या शतकातील आव्हानांना तोंड देण्यास असमर्थ आहेत. जगाच्या विविध भागात सुरू असलेले संघर्ष असोत, साथीचे रोग असोत, आर्थिक संकट असोत किंवा सायबरस्पेसमध्ये नव्याने उदयास येणारी आव्हाने असोत, या संस्थांकडे कोणताही उपाय नाही.
हे ही वाचा : 
हरियाणात ४.४ रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले!
ज्ञानाचे अमृतकुंभ असे माझे गुरू डॉ. भटकर, डॉ. माशेलकर!
”मी हिंदू आहे” कावड मार्गावरील दुकानांवर झळकले पोस्टर्स!
एमजीचा प्रीमियम अनुभव आता ठाण्यात — JSW MG ने सुरू केले पहिले सिलेक्ट सेंटर!
ब्राझीलियामध्ये सन्मानित
ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर, पंतप्रधान मोदी ब्राझीलच्या राज्य दौऱ्यासाठी ब्राझीलियाला रवाना झाले. येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस’ देऊन सन्मानित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्या उपस्थितीत भारत आणि ब्राझीलमध्ये अनेक महत्त्वाचे करार (एमओयू) करण्यात आले. दोन्ही देशांमधील व्यापार, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक सहकार्य मजबूत करण्याच्या दिशेने हे करार एक मोठे पाऊल मानले जातात.
नामिबियात अनेक करार
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या परदेश दौऱ्याच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात नामिबियाला पोहोचले. नामिबियाचे राष्ट्राध्यक्ष नेतुम्बो नंदी यांनी नामिबियाच्या स्टेट हाऊसमध्ये पंतप्रधानांचे स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नामिबियाचे राष्ट्राध्यक्ष डॉ. नेतुम्बो नंदी-नदैतवाह यांनी नामिबियातील विंडहोक येथे प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चा केली. या दरम्यान अनेक करार प्रस्तावांवर करार झाला आणि दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी करारांवर स्वाक्षरी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाने सर्वोच्च नागरी सन्मान देखील प्रदान केला आहे.
बुधवारी पंतप्रधान मोदींना नामिबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेल्विट्सचिया मिराबिलिस’ प्रदान करण्यात आला. पंतप्रधान मोदींनी नामिबियाच्या संसदेला संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात भारत-नामिबिया संबंधांच्या भविष्यातील दृष्टिकोनाबद्दलही सांगितले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपण नामिबियाचा राष्ट्रीय पक्षी, आफ्रिकन फिश ईगलचे मार्गदर्शन घेऊया. तो आपल्याला एकत्र उंच उडण्यास, क्षितिज पाहण्यास आणि धैर्याने संधींपर्यंत पोहोचण्यास शिकवत आहे.
Exit mobile version