ते स्वतः जामिनावर बाहेर आहेत हे विसरले वाटतं 

राहुल गांधींवर मुख्यमंत्री हिमंता सरमा यांचा पलटवार 

ते स्वतः जामिनावर बाहेर आहेत हे विसरले वाटतं 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर मोठा हल्लाबोल केला आणि म्हटले की हिमंता यांना तुरुंगात जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आसाममधील चायगाव येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत राहुल यांनी दावा केला की आसामचे मुख्यमंत्री स्वतःला ‘राजा’ मानतात, परंतु ते लवकरच तुरुंगात जातील. त्याचवेळी मुख्यमंत्री हिमंता यांनी राहुल गांधीच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देत टीका केली.

राहुल गांधी यांनी आसाममधील चायगाव येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री हिमंता यांच्यावर निशाणा साधला आणि म्हटले की, ‘मी आज सांगत आहे की थोड्याच वेळात मीडिया तुमच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात जाताना दाखवेल आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा देखील त्यांना वाचवू शकणार नाहीत. काँग्रेस पक्ष हे करणार नाही. हे काम तरुण, शेतकरी, कामगार आणि आसाममधील प्रत्येक वर्गातील लोक करतील, कारण त्यांना माहिती आहे की ही व्यक्ती भ्रष्ट आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘त्यांना (हिमंता) माहित आहे की एक दिवस काँग्रेसचे सिंह त्यांना तुरुंगात टाकतील. त्यांना त्यांच्या सर्व भ्रष्टाचाराचे उत्तर आसामच्या लोकांना द्यावे लागेल. तुम्ही लोक काँग्रेस पक्षाचे सिंह आणि सिंहिणी आहात. सिंह आणि सिंहिणी कोणालाही घाबरत नाहीत. काँग्रेसची विचारसरणी तुमच्या डीएनएमध्ये आहे.’

हे ही वाचा   : 

भारताने केला चमत्कार अमेरिका-चीनलाही मागे टाकले

२६ जणांना ठार मारल्यानंतर पहलगाम दहशतवाद्यांचा आनंद साजरा करण्यासाठी हवेत गोळीबार!

‘पंतप्रधान धन-धान्य कृषि योजना’ ला मंजुरी

दिग्विजय सिंह यांचे कावड यात्रेवर प्रश्न-नमाजचा फोटो, भाजपा म्हणाली- हा तर मौलाना!

दरम्यान, राहुल गांधींच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री सरमा यांनी निशाणा साधत म्हणाले, ”लिहून घ्या, हिमंत बिस्वा सर्मा यांना निश्चितच तुरुंगात पाठवले जाईल”, हेच वाक्य विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आसाममधील काँग्रेसच्या राजकीय व्यवहार समितीसोबतच्या बंद बैठकीत म्हटले होते. ते फक्त हे सांगण्यासाठी आसाममध्ये आले होते, परंतु आमचे नेते हे विसरले की ते स्वतः देशभरात दाखल असलेल्या अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये जामिनावर आहेत.

Exit mobile version