हिंदी-मराठी वादावर उदित नारायण यांनी काय केले भाष्य

हिंदी-मराठी वादावर उदित नारायण यांनी काय केले भाष्य

महाराष्ट्रात निर्माण झालेल्या हिंदी आणि मराठी भाषेच्या वादावर प्रसिद्ध गायक उदित नारायण यांनी संतुलित आणि समंजस प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सर्वांना ‘संस्कृतीचा सन्मान’ करण्याचे आवाहन केले आहे. उदित नारायण यांनी आयएएनएसशी संवाद साधताना सांगितले की, महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने स्थानिक भाषा आणि संस्कृतीचा सन्मान करावा, परंतु त्याच वेळी भारतातील इतर भाषांचाही आदर केला गेला पाहिजे.

त्यांनी म्हटले, “जर आपण महाराष्ट्रात राहत असाल, तर मराठी भाषा आणि इथल्या संस्कृतीचा आदर करायलाच हवा. पण त्याचबरोबर भारतातल्या इतर भाषांचाही सन्मान झाला पाहिजे. ते पुढे म्हणाले, “मी स्वतः महाराष्ट्रात राहतो, ही माझी कर्मभूमी आहे, त्यामुळे इथली भाषा माझ्यासाठी खास आहे. मात्र, आपला देश खूप मोठा आहे आणि इथल्या सर्व भाषांना मराठीप्रमाणेच सन्मान मिळायला हवा. यापूर्वी, कंगना रनौत हिनेसुद्धा या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली होती. तिने आयएएनएसशी बोलताना देशाच्या एकतेवर भर देत म्हटले की काही लोक केवळ राजकीय फायद्यासाठी अशांतता निर्माण करत आहेत.

हेही वाचा..

‘लठ्ठपणा’च्या विळख्यात आहेत चिमुरडी

मोहरम मिरवणुकीत ‘हिंदू राष्ट्र’चा बॅनर जाळला, चार मुस्लिमांना अटक!

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पितृशोक

पश्चिमोत्तानासनाचा प्रभावी उपाय कशाकशावर ?

कंगनाने मराठी आणि हिमाचली लोकांची तुलना करत सांगितले की, “महाराष्ट्रातील लोक, विशेषतः मराठी माणसं खूप प्रेमळ आणि सरळ स्वभावाची आहेत, अगदी आमच्या हिमाचली लोकांसारखीच. काही लोक केवळ राजकारणात  चमकण्यासाठी आणि स्वतःचे राजकीय स्वार्थ साधण्यासाठी वातावरण बिघडवतात. पण आपण हे विसरू नये की आपण सर्वजण एका देशाचा भाग आहोत. ती पुढे म्हणाली, “महाराष्ट्र, गुजरात आणि दक्षिण भारतातून अनेक लोक हिमाचलमध्ये येतात, ते किती निरागस असतात. आपल्याला आपल्या देशाच्या एकतेचा विसर पडू नये.

माहिती म्हणून, सध्या महाराष्ट्रात हिंदी आणि मराठी भाषेचा वाद चांगलाच चिघळलेला आहे. हा वाद शाळांमध्ये हिंदी शिकवण्यासंबंधी महाराष्ट्र सरकारने काढलेल्या आदेशानंतर सुरू झाला. महाराष्ट्र सरकारने एक आदेश जारी करून सांगितले की, पहिली ते पाचवीच्या वर्गांमध्ये हिंदी विषय अनिवार्य असेल. या आदेशावर विपक्षाने तीव्र आक्षेप घेतला आणि सरकारवर सडकून टीका केली. या टीकेनंतर राज्य सरकारने तो आदेश मागे घेतला.

Exit mobile version