सलमान खानच्या घरी कोण घुसलं ?

गुन्हा दाखल केला

सलमान खानच्या घरी कोण घुसलं ?

बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्या बांद्रा येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये एक अनोळखी व्यक्ती जबरदस्तीने घुसल्याची घटना २० मेच्या संध्याकाळी घडली आहे. पोलिसांनी त्या संशयित व्यक्तीस ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. ही घटना २० मे रोजी संध्याकाळी ७ वाजून १५ मिनिटांची आहे. संबंधित व्यक्ती बेकायदेशीररित्या सलमान खान यांच्या घरात शिरला. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने त्या व्यक्तीस अटक केली. चौकशीत त्या व्यक्तीचे नाव जितेंद्र कुमार सिंह असल्याचे निष्पन्न झाले असून तो छत्तीसगडचा रहिवासी आहे. आता पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तो सलमान खानच्या घरी का गेला? त्याचा हेतू काय होता? तो फॅन होता की यामागे काही दुसरे कारण होते? याबाबत चौकशी सुरू आहे.

याआधी, मागच्या महिन्यात, सलमान खान यांना मुंबईतील वरळी ट्रॅफिक विभागाच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवरून धमकीचे मेसेजेस आले होते. त्या मेसेजमध्ये त्यांच्या घरात घुसून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. एवढेच नाही, त्यांच्या गाडीला स्फोटकांनी उडवून देण्याची धमकीही दिली गेली होती. या प्रकरणी वर्ली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर सलमान खान यांच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची सुरक्षा वाढवण्यात आली होती. गुन्हा दाखल केल्यानंतर २४ तासांच्या आत पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला. चौकशीत समोर आले की धमकी देणारा व्यक्ती गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील वाघोडिया तालुक्यातील रहिवासी असून त्याचे नाव मयंक पांड्या आहे. पोलिसांनी सांगितले की, तो मानसिक आजाराने त्रस्त आहे आणि त्यानेच हे धमकीचे मेसेज पाठवले होते.

हेही वाचा..

“दहशतवादी पाकिस्तानात असतील तर, जिथे असतील तिथेच मारू”

मसाला निर्यातीला चालना देण्यासाठी सरकारची योजना बघा

‘पातालगरुडी’: एक जादुई वनस्पती

शिल्पा शिरोडकर म्हणाल्या आता बरे वाटतेय

सलमान खानचे चाहते आणि स्थानिक नागरिक या घडलेल्या घटनेमुळे चिंतेत आहेत, कारण सलमान खान यांचे घर यापूर्वीदेखील सुरक्षेच्या दृष्टीने चर्चेत राहिले आहे. २०२३ मध्ये लॉरेंस गँगकडून धमकी मिळाल्यानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती आणि त्यांना महाराष्ट्र सरकारकडून ‘वाय प्लस’ श्रेणीची सुरक्षा मिळाली आहे. १४ एप्रिल २०२४ रोजी त्यांच्या घरावर गोळीबारही झाला होता. त्यांना अनेक वेळा धमक्या मिळाल्या आहेत. त्यामुळे कोणताही अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरात घुसण्याचा प्रकार अतिशय गंभीर मानला जात आहे.

Exit mobile version