उपराष्ट्रपती निवडणूक: तिरुची शिवा असणार विरोधी पक्षाचे उमेदवार?

तिरुची शिवा यांनीही दिली प्रतिक्रिया 

उपराष्ट्रपती निवडणूक: तिरुची शिवा असणार विरोधी पक्षाचे उमेदवार?

भारताच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. ही निवडणूक बिनविरोधी व्हावी अशी सत्ताधारी पक्षाची इच्छा आहे, यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना फोन केल्याची माहिती आहे. तसेच भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर सांगितले की, “पुढील उपराष्ट्रपती एकमताने निवडून यावे अशी आमची इच्छा आहे, आम्ही विरोधी नेत्यांशी संपर्क साधला आहे.” याच दरम्यान, आता असे मानले जात आहे की विरोधी पक्षही आपला उमेदवार जाहीर करू शकतात. उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षांकडून डीएमके खासदार तिरुची शिवा यांचे नाव चर्चेत येत आहे. या अटकळांवर खासदार तिरुची शिवा यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. 

तिरुची शिवा हे तामिळनाडूच्या सत्ताधारी पक्ष द्रमुकचे राज्यसभा खासदार आणि एक वरिष्ठ नेते आहेत. त्यांना द्रमुकचे एक महत्त्वाचे रणनीतीकार मानले जाते. तिरुची शिवा यांनी सामाजिक न्याय, राज्यांचे हित आणि संघराज्य व्यवस्थेवर खूप काम केले आहे. दरम्यान, उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवर तिरुची शिवा म्हणाले, “मला याबद्दल कोणतीही माहिती नाही आणि फक्त नेतेच हा निर्णय घेतील. मी हे सांगणारा व्यक्ती नाही. माझे नेते यावर चर्चा करत आहेत.” तसेच उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदवाराचा निर्णय घेण्यासाठी मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी बैठक सुरू असल्याच्याही बातम्या येत आहेत.

हे ही वाचा : 

हा तर चौकीदार चोर है चा पार्ट-२

“पाकिस्तानसारखं राहुल गांधींचंही प्रत्येक राजकीय लाँच अपयशी ठरतं”

ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्या स्पेस स्टेशनच्या प्रवासावर चर्चा न होऊ शकणे दुर्दैवी

ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानने लढाऊ नौका लपवल्या, उपग्रह छायाचित्रांनी केले स्पष्ट

दरम्यान, सोमवारी (१८ ऑगस्ट ) द्रमुकचे खासदार तिरुची शिवा यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला. ते म्हणाले, “राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी काही तथ्ये आणि आकडेवारी सादर केली आहे. निवडणूक आयोगाने स्वतःहून दखल घेऊन निवेदन द्यायला हवे होते, परंतु ते प्रतिज्ञापत्र मागत आहे. निवडणूक आयोगाने जबाबदारीने वागावे अशी आमची अपेक्षा आहे. ती एक संवैधानिक संस्था आहे. जेव्हा जबाबदार राजकीय पक्ष एखादा मुद्दा उपस्थित करतात तेव्हा त्यांना काही स्पष्टीकरण द्यावे लागते.” 

 

Exit mobile version