सोनं-चांदी ETF विक्रम पातळीवर

गुंतवणूकदारांनी विक्री करावी की खरेदी वाढवावी?

सोनं-चांदी ETF विक्रम पातळीवर

सोनं आणि चांदीच्या किमतींनी सध्या विक्रमी उच्चांक गाठल्याने त्यावर आधारित एक्स्चेंज ट्रेडेड फंड्स (ETF) देखील ऐतिहासिक पातळीवर पोहोचले आहेत. इंडिया टूडे मधील वृत्तानुसार, गेल्या १२ महिन्यांत सोन्याच्या ETF मध्ये सुमारे ७०–८०% वाढ नोंदवली गेली आहे, तर चांदीच्या ETF ने तब्बल १८०–१९०% इतका जबरदस्त परतावा दिला आहे. या जोरदार वाढीमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह निर्माण झाला असला, तरी पुढील रणनीती काय असावी, हा प्रश्नही निर्माण झाला आहे.

तज्ज्ञांच्या मते, सध्याची पातळी ही अत्यंत उच्च असल्यामुळे आता मोठ्या प्रमाणात नवीन गुंतवणूक करणे धोकादायक ठरू शकते. किमतींमध्ये झालेल्या तीव्र वाढीनंतर ५–१०% पर्यंत दुरुस्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आधीपासून गुंतवणूक असलेल्या गुंतवणूकदारांनी २०–३०% नफा वसूल करून जोखीम कमी करावी, असा सल्ला काही बाजारतज्ज्ञ देत आहेत.
हे ही वाचा :
दिल्ली हे खलिस्तानी, बांगलादेशस्थित दहशतवाद्यांचे लक्ष्य

भारताकडून पल्स टॅरिफ; अमेरिकेच्या डाळींवर भारताने लावला कर?

महाराष्ट्रात महायुतीची घवघवीत आघाडी

महानगरपालिका निवडणुकीतील अपयशावर राज ठाकरे काय म्हणाले?

दुसरीकडे, दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी सोनं आणि चांदी ही सुरक्षित संपत्ती मानली जाते. महागाई, जागतिक अनिश्चितता आणि डॉलरमधील चढ-उतार लक्षात घेता पुढील काही वर्षांतही या धातूंना आधार मिळू शकतो. संधी चुकण्याच्या भीतीने एकरकमी गुंतवणूक टाळावी, असे तज्ज्ञ स्पष्ट करतात.

सध्याच्या परिस्थितीत, टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे, किंमतींमध्ये घसरण झाल्यावरच नवीन खरेदी करणे आणि स्वतःची जोखीम क्षमता लक्षात घेऊन निर्णय घेणे, हाच शहाणपणाचा मार्ग असल्याचे बाजारतज्ज्ञांचे मत आहे.

Exit mobile version