राजा रघुवंशीला ठार मारताना पत्नी सोनम हजर होती!

चार आरोपींची कबुली

राजा रघुवंशीला ठार मारताना पत्नी सोनम हजर होती!

इंदोर येथील व्यावसायिक राजा रघुवंशी यांच्या हत्या प्रकरणी चार आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे, अशी माहिती मंगळवारी इंदोर क्राईम ब्रँचनं दिली. सहाय्यक पोलिस आयुक्त पूनमचंद यादव यांनी सांगितलं की, आरोपींनी केवळ हत्या केल्याची कबुली दिली नाही, तर हत्या झाली तेव्हा राजाची पत्नी सोनम रघुवंशीही घटनास्थळी उपस्थित होती आणि आपल्या नवऱ्याला ठार मारले जात असताना तिने पाहिले.

“सर्व चार आरोपींनी राजा रघुवंशीच्या हत्येची कबुली दिली आहे,” असे यादव यांनी स्पष्ट केले. “पहिला वार विशाल ऊर्फ विक्की ठाकुरने केला.”

अंमलदारांच्या चौकशीत आरोपींनी उघड केलं की त्यांनी राजा रघुवंशीवर हल्ला केला आणि नंतर त्याचा मृतदेह खोल दरीत फेकून दिला.

सुनियोजित कट

इंदोर क्राईम ब्रँचच्या तपासानुसार, विशाल, आकाश आणि आनंद हे तीन आरोपी इंदोरहून रेल्वेने निघाले. त्यांनी अनेक ट्रेन बदलून प्रथम गुवाहाटी आणि नंतर शिलाँगपर्यंतचा प्रवास केला, अशी माहिती ACP यादव यांनी दिली.

हे ही वाचा:

एनएसई: ३० वर्षांचा दिमाखदार प्रवास

मुंब्रा घटनेनंतर सरकारी कार्यालयाच्या वेळा बदलण्यात येणार!

‘रीमेक’ चित्रपटांबाबत आनंद पंडित यांचे काय मत?

मीरा राजपूत ने शेअर केले सुंदर फोटो

राज कुशवाहा, जो सोनमचा प्रियकर व कटात सहभागी असल्याचा संशय आहे, तो इंदोरमध्येच राहिला. मात्र त्याने तिघांनाही प्रवासासाठी प्रत्येकी ₹४०,००० ते ₹५०,००० आर्थिक मदत केली, असं तपासात समोर आलं आहे.

आरोपींनी पोलिसांना सांगितले की, सोनम घटनास्थळी हजर होती आणि तिने राजा रघुवंशीचा मृत्यू पाहिला.

सोनम हत्येनंतर मेघालयमध्येच राहिली की परतली?

सोनम हत्येनंतर मेघालयातच राहिली की परत इंदोरला आली, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. “ही माहिती मेघालय पोलिसांकडून अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही,” असं एसीपी यादव यांनी सांगितलं.

प्रकरण काय आहे?

राजा रघुवंशी आणि सोनम यांचा १० मे रोजी इंदोरमध्ये विवाह झाला. काही दिवसांनी हे दोघं हनिमूनसाठी शिलाँगला गेले. २१ मे रोजी त्यांनी सोहरा (चेरापुंजी) परिसरात स्कूटरने भटकंती केली. दुसऱ्या दिवशी दोघेही बेपत्ता झाले.

२ जून रोजी चेरापुंजीजवळील दरीतून राजाचा अर्धवट कुजलेला मृतदेह सापडला, त्याच्या डोक्यावर व शरीरावर धारदार हत्यारांचे वार होते, ज्यामुळे मृत्यू झाला होता.

प्रकरणाने नाट्यमय वळण घेतलं जेव्हा सोनमने ९ जून रोजी उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील एका ढाब्यावर आत्मसमर्पण केलं. तिच्या वडिलांनी तिच्यावरचे आरोप फेटाळले आणि पोलिसांनी खोटे आरोप केल्याचा आरोप केला. मात्र आता आरोपींनी सोनम घटनास्थळी होती, अशी कबुली दिली आहे.

सोनम सतत फोनवरून राज कुशवाहाशी संपर्कात होती, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे, ज्यामुळे संपूर्ण कट रचल्याची शक्यता अधोरेखित होते.

Exit mobile version