राम मंदिरात नमाज पढण्याचा प्रयत्न चिंताजनक

राम मंदिरात नमाज पढण्याचा प्रयत्न चिंताजनक

अयोध्येतील राम मंदिरात नमाज पढण्याचा प्रयत्न होणे ही अत्यंत चिंताजनक घटना असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. भाजपचे राज्यसभा खासदार मनन कुमार मिश्रा यांनी वृत्तसंस्था आयएएनएसशी बोलताना सांगितले, अशा लोकांशी कठोरपणे वागले पाहिजे. कोणताही हिंदू मशीदीत जाऊन पूजा-पाठ करावा, असा विचारही करू शकत नाही. आम्ही इतर धर्मस्थळाला ठेच पोहोचवण्याचा विचारही करत नाही. पण एका वर्गातील लोकांची पातळी बघा — ते आमच्या राम मंदिरात घुसले आणि तिथे नमाज अदा करू लागले. यांचा उद्देश फक्त गोंधळ निर्माण करणे, स्वतःला माध्यमांत ठेवणे आणि देशात अशांतता पसरवणे हाच आहे.”

मनन कुमार मिश्रा यांनी सांगितले की, अशा लोकांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. त्यांनी असेही म्हटले की, जर दुसऱ्या धर्मस्थळी अशी घटना घडली असती तर अशा लोकांना रस्त्यावरच मारहाण करून संपवले गेले असते. भाजप खासदार म्हणाले की, “आम्ही (हिंदू) फार सहिष्णु आहोत, खूप सहन करतो. याचा अर्थ असा नाही की कुणीही काहीही करावे.”

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आर. पी. सिंग यांनी म्हटले की, अयोध्येतील या घटनेची चौकशी होणे अत्यावश्यक आहे. हा त्या व्यक्तीचा वैयक्तिक निर्णय होता की समाजात अशांतता पसरवण्याच्या उद्देशाने आखलेली योजना होती, याचा शोध घेतला पाहिजे. चौकशीनंतर वस्तुनिष्ठ तथ्यांच्या आधारे आरोपीवर कारवाई केली पाहिजे.

हेही वाचा..

मुंबईला बांग्लादेशी व रोहिंग्यामुक्त करणार

सर्वप्रथम एमआयएम पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बुरखाधारी महिलेला तर बसवा!

उबाठाचे निष्ठावान दगडू सकपाळ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत

जेएनयूतले डाव्यांचे विद्यार्थी आंदोलन की वैचारिक विघटन..?

भाजप प्रवक्ते प्रातुल शाह देव यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “येथे सनातन संस्कृतीची महानता स्पष्ट दिसते. अयोध्या, जी सनातन धर्म मानणाऱ्यांसाठी श्रद्धेचे पवित्र केंद्र आहे, तिथे हा माणूस आपल्या धर्माशी संबंधित घोषणा देतो आणि नमाज पढण्याचाही प्रयत्न करतो. तरीसुद्धा सनातन संस्कृतीची महानता अशी की लोकांनी त्याला पकडून सुरक्षा दलांच्या ताब्यात दिले. हे आमच्या धर्मातील आणि त्यांच्या धर्मातील सहनशीलतेतील फरक दाखवते.” ते पुढे म्हणाले, “जर सनातन धर्माचा कोणी व्यक्ती दिल्लीच्या जामा मशिदीत जाऊन हनुमान चालीसा वाचायला लागला, तर लोक दगडफेक करून त्याच्यावर हल्ला करतील, असे आपण कल्पना करू शकता का?”

Exit mobile version