बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे निधन; भारताशी कसे होते संबंध?

वयाच्या ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे निधन; भारताशी कसे होते संबंध?

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) च्या प्रमुख नेत्या बेगम खालेदा झिया यांचे निधन झाले. मंगळावर, ३० डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बऱ्याच काळापासून आजारी असलेल्या खालेदा झिया यांच्यावर देश-विदेशात उपचार सुरू होते. खालेदा झिया या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या तसेच त्यांनी तीन वेळा सरकारचे नेतृत्व केले होते.

१५ ऑगस्ट १९४५ रोजी दिनाजपूर जिल्ह्यात जन्मलेल्या बेगम खालेदा झिया यांनी १९८१ मध्ये त्यांचे पती, बांगलादेशचे तत्कालीन राष्ट्रपती झियाउर रहमान यांची हत्या झाली तेव्हा त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. त्यांनी त्यांच्या पतीच्या निधनानंतर बीएनपीची जबाबदारी स्वीकारली. १९९१ मध्ये, त्या पहिल्यांदाच पंतप्रधान झाल्या. त्या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. बेगम खालिदा झिया यांचा तिसरा कार्यकाळ २००१ ते २००६ पर्यंत चालला. या काळात त्यांनी मुक्त बाजार अर्थव्यवस्था, खाजगीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले. तथापि, त्यांच्या सरकारवर भ्रष्टाचार, राजकीय हिंसाचार, प्रशासकीय कमकुवतपणा आणि कट्टरपंथी घटकांना प्रोत्साहन देण्याचे आरोप करण्यात आले.

माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी त्यांचे राजकीय वैर होते. बेगम खालिदा झिया यांच्या सरकारच्या पतनानंतर, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप दाखल करण्यात आले आणि त्यानंतर त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. २०१८ मध्ये बेगम खालिदा झिया यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आले. या काळात त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्या पक्षाने आणि कुटुंबाने शेख हसीना यांच्या सरकारला त्यांना चांगल्या उपचारांसाठी परदेशात पाठवण्याची वारंवार विनंती केली असली तरी, शेख हसीना यांनी ही विनंती नाकारली.

आता शेख हसीना यांचे सरकार कोसळले आहे आणि बांगलादेशमध्ये पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये निवडणुका होणार आहेत, त्यामुळे त्यांचे जाण्याचे राजकीय महत्त्व आहे. १७ वर्षांच्या निर्वासनानंतर त्यांचा मुलगा तारिक रहमान बांगलादेशला परतला आहे. दरम्यान, काही वर्षांपूर्वी खालिदा झिया यांचे धाकटे पुत्र अराफत रहमान कोको यांचे मलेशियात निधन झाले.

हे ही वाचा:

पुतिन यांच्या निवासस्थानावर ९१ ड्रोन्सचा हल्ला; ट्रम्प काय म्हणाले?

गुणवत्ता तपासणीसाठी १०८ लॅब्सना मंजुरी

आयबीसीमध्ये सुधारणा केल्याने कर्ज वसुलीत आराम

उन्नाव बलात्कार प्रकरण: सुप्रीम कोर्टच्या निर्णयामुळे पीडिता समाधानी

१९६० मध्ये, खालिदा झिया यांनी झियाउर रहमान यांच्याशी लग्न केले, जे त्यावेळी पाकिस्तानी सैन्यात कॅप्टन होते. लग्नानंतर, त्यांनी १९६५ पर्यंत दिनाजपूरमधील सुरेंद्रनाथ कॉलेजमध्ये शिक्षण सुरू ठेवले, त्यानंतर त्या काही वर्षे त्यांच्या पतीसोबत राहण्यासाठी पाकिस्तानात गेल्या. त्यावेळी बांगलादेश देखील पाकिस्तानचा भाग होता. १९७१ मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी मुक्ती युद्ध सुरू झाले तेव्हा झियाउर रहमान यांनी पाकिस्तानी सैन्याविरुद्ध बंड केले आणि युद्धात भाग घेतला. दरम्यान, बेगम खालिदा झिया यांना पाकिस्तान समर्थक मानले जात होते आणि त्यांचे भारताशी असलेले संबंध अविश्वासाने भरलेले होते. त्यांच्या कार्यकाळात भारत- बांगलादेश संबंध विशेषतः सौहार्दपूर्ण नव्हते आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था, आयएसआयने बांगलादेशला आपला ऑपरेटिंग बेस बनवले होते. त्यांच्या कार्यकाळात ईशान्य भारतात मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाली आणि दहशतवादी घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली. खालिदा झिया यांनी असे आरोप फेटाळले असले तरी, वास्तविकता अशी होती की त्यांच्या कार्यकाळात ईशान्य भारतात अनेक हिंसक घटना घडल्या.

Exit mobile version