पाक संरक्षण मंत्री म्हणतात, “अफगाणी भारताशी नेहमीच एकनिष्ठ राहिलेत”

तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी भारत दौऱ्यावर

पाक संरक्षण मंत्री म्हणतात, “अफगाणी भारताशी नेहमीच एकनिष्ठ राहिलेत”

अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी हे भारत दौऱ्यावर आले आहेत. भारत आणि अफगाणिस्तान यांची जवळीक पाहता पाकिस्तानला मिरच्या झोंबल्याचे चित्र आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानसाठी नेहमी त्याग केला असूनही, काबूल नेहमीच भारताच्या सोबत उभा राहिला आहे.

मुलाखतीत बोलताना ख्वाजा आसिफ म्हणाले की, “काल, आज आणि उद्या अफगाणी ऐतिहासिकदृष्ट्या भारताशी एकनिष्ठ राहिले आहेत.” आपल्या देशाच्या मागील सरकारांवर टीका करताना, आसिफ म्हणाले की लाखो अफगाण निर्वासितांना आश्रय देण्याचा पाकिस्तानचा निर्णय अमेरिकेच्या दबावाखाली घेण्यात आला होता. आम्ही अफगाणिस्तानसाठी मोठे त्याग केले, तरीही ते कधीही आमच्या पाठीशी उभे राहिले नाहीत, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

गुरुवारी पाकिस्तानच्या राष्ट्रीय सभेला संबोधित करताना, आसिफ यांनी काबुलला इशारा दिला आणि म्हटले की, इस्लामाबादचा संयम संपला आहे आणि अफगाणिस्तानच्या भूमीतून होणारा दहशतवाद असह्य आहे. त्यांनी सांगितले की, पाकिस्तान दहशतवादी सुविधा देणारे जिथे असतील तिथे त्यांचा पाठलाग करेल. जर तालिबान सीमेवर कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांना रोखण्यात अपयशी ठरले तर इस्लामाबाद अधिक कठोर पावले उचलू शकते.

हे ही वाचा :

भारत काबूलमधील दूतावास पुन्हा सुरू करणार!

‘जस्सू’ बनून हिंदू मुलीला फसवणाऱ्या सोहेलला बजरंग दलाने पकडले!

शांतता, ट्रम्पना नोबेल नाही… व्हेनेझुएलाच्या मच्याडोंची निवड

शपथपत्रात खोटी माहिती सादर केल्याप्रकरणी प्रशांत भूषण यांना न्यायालयाची तंबी

२०२१ मध्ये तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर काबूलहून आलेला हा पहिला उच्चस्तरीय दौरा आहे. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्या सहा दिवसांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबादमधून नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे बोलले जात आहे. ९ ते १६ ऑक्टोबर दरम्यान त्यांच्या भेटीसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने त्यांना निर्बंधांमधून तात्पुरती प्रवास सूट दिल्यानंतर मुत्ताकी गुरुवारी नवी दिल्लीत पोहोचले. मे महिन्यात जयशंकर यांच्याशी झालेल्या फोन संभाषणानंतर मुत्ताकी यांचा हा दौरा आहे, जो गट सत्तेत परतल्यानंतर भारत आणि तालिबान राजवटीतील सर्वोच्च पातळीवरील संपर्क आहे.

Exit mobile version