भारतीय निवडणूक आयोगाने शनिवारी राजकीय पक्ष व कार्यकर्त्यांवर, मागील निवडणुकांमधील मतदार याद्यांतील कथित चुका दाखवत, उशिरा आक्षेप घेतल्याबद्दल टीका केली आहे. आयोगाने स्पष्ट केले की, अशा त्रुटींसाठी विशेषतः दावे व आक्षेप कालावधी असतो. निवडणूक आयोगाने सांगितले की मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया ही पारदर्शक, बहुपर्यायी टप्प्यातील असून प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्ष सहभागी असतात.
१० मुद्द्यांच्या निवेदनात, आयोगाने स्पष्ट केले की जर त्या वेळेत मुद्दे उपस्थित केले असते, तर उपविभागीय अधिकारी (ERO) यांनी त्यांची पडताळणी करून खरी चूक असल्यास ती निवडणुकांपूर्वी दुरुस्त केली असती.
आयोगाने सांगितले की अनेक राजकीय पक्ष आणि त्यांचे बूथ लेव्हल एजंट्स यांनी मसुदा यादी वेळेवर तपासलीच नाही किंवा आक्षेप नोंदवले नाहीत.
“अलीकडे काही राजकीय पक्ष व व्यक्ती मतदार याद्यांतील त्रुटींविषयी बोलत आहेत. यासाठी योग्य वेळ म्हणजे त्या टप्प्यातील दावे व आक्षेप कालावधी. यादी सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांना दिल्याचा उद्देश हाच असतो.”
हे ही वाचा:
“२५०० पानांची चार्जशीट… यूट्यूबर ज्योती मल्होत्रा अडचणीत!”
“२५०० पानांची चार्जशीट… यूट्यूबर ज्योती मल्होत्रा अडचणीत!”
रशिया-युक्रेन युद्धबंदी नाहीतर होणार शांतता करार?
आयोगाने पुढे म्हटले, जर हे प्रश्न योग्य वेळी, योग्य मार्गाने उपस्थित केले असते, तर संबंधित ERO ने खरी चूक असल्यास ती दुरुस्त करू शकला असता.”
मसुदा डिजिटल आणि भौतिक स्वरूपात प्रकाशित होतो. तो सर्व राजकीय पक्षांना दिला जातो व आयोगाच्या संकेतस्थळावर सार्वजनिक प्रवेशासाठी ठेवला जातो. ERO अर्थात उपविभागीय दंडाधिकारी पातळीचे अधिकारी आणि BLO (बूथ लेव्हल अधिकारी) यांच्या जबाबदारीवर यादीची अचूकता अवलंबून असते.
निवडणूक आयोग उद्या (रविवार) नवी दिल्लीतल्या नॅशनल मीडियासेंटरमध्ये पत्रकार परिषद घेणार आहे. यात अलीकडील राजकीय घडामोडींवर भाष्य होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांचा आरोप आहे की २०२४ लोकसभा निवडणुकीत भाजपाला फायदा मिळावा म्हणून मोठ्या प्रमाणावर बनावट मतदार समाविष्ट केले गेले.
राहूल गांधी म्हणतात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकसारख्या राज्यांत खोटे मतदार घुसडले गेले. त्यांनी दावा केला की कर्नाटकमधील महादेवपूरा विधानसभा क्षेत्रात एक लाखाहून अधिक बनावट मते पडली. हे मतदारसंघ बेंगळुरू मध्य लोकसभा मतदारसंघात मोडते, जेथे भाजपने ३२,७०७ मतांनी विजय मिळवला.
काँग्रेसने असे आरोप इतर अनेक मतदारसंघांवरही केले असून, गांधी यांनी म्हटले की जिथे काँग्रेस ५० हजार पेक्षा कमी मतांनी पराभूत झाली, अशा सुमारे ७० जागांवर मतदार फसवणुकीचा प्रभाव पडला असू शकतो.
