प्रचारात धमक्या देणाऱ्या तृणमूलच्या जहांगीर खानने निवडणुकीतून काढला पळ

सरकार बदलल्यावर विचार बदलले

प्रचारात धमक्या देणाऱ्या तृणमूलच्या जहांगीर खानने निवडणुकीतून काढला पळ

पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील फलता विधानसभा पुनर्निवडणुकीपूर्वी मोठ्या राजकीय घडामोडीत, तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, ज्यामुळे माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला.

फाल्टा मतदारसंघात खान यांचा सामना भारतीय जनता पक्षाचे देबांग्शु पांडा आणि काँग्रेसचे अब्दुर रज्जाक मोल्ला यांच्याशी होणार होता. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चे संभू नाथ कुर्मी हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पण आता जहांगीर खान यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रचारादरम्यान आयपीएस अधिकारी अजय पाल शर्मा यांना तुम्ही सिंघम असाल तर मी पुष्पा आहे, अशा शब्दांत जहांगीर खानने धमकावले होते. पण आता त्याने निवडणुकीतूनच माघार घेतली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना जहांगीर खान म्हणाले की, त्यांनी आपल्या मतदारसंघातील लोकांच्या हितासाठी फलता विधानसभा पुनर्निवडणुकीतून माघार घेतली आहे. “मी फाल्टाचा मुलगा आहे आणि मला फाल्टा मतदारसंघ शांत राहावा आणि प्रगती करावी असे वाटते. आमचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी फाल्टाच्या विकासासाठी विशेष पॅकेज देत आहेत, त्यामुळे मी मतदारसंघातील पुनर्निवडणूक प्रक्रियेतून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे,” असे खान म्हणाले.

हे ही वाचा:

‘बुलेट’ वेगाने धावणार महाराष्ट्राची अर्थव्यवस्था!

न्यायालयाच्या अवमान प्रकरणी केजरीवालांसह ‘आप’च्या सहा नेत्यांना नोटीस

मोदींना प्रश्न विचारणाऱ्या ‘त्या’ पत्रकाराला भारताने खडसावले!

ममता सरकारमध्ये डावललेल्या आयपीएस अधिकाऱ्याला भाजपकडून मोठी जबाबदारी

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील फलता विधानसभा मतदारसंघातील सर्व २८५ मतदान केंद्रांवर २१ मे रोजी पुनर्निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. २९ एप्रिल रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात फाल्टा येथे मतदानादरम्यान “गंभीर निवडणूक गैरप्रकार आणि लोकशाही प्रक्रियेचे उल्लंघन” झाल्यामुळे पुनर्निवडणुकीचे आदेश देण्यात आले.

आयोगाने सांगितले की, सर्व मतदान केंद्रांवर, सहाय्यक मतदान केंद्रांसह, २१ मे रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेत “कडक सुरक्षा व्यवस्थेखाली मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक” मतदान प्रक्रिया पार पडेल. या मतदारसंघातील मतमोजणी २४ मे रोजी होणार आहे.

फाल्टा बनले होते संवेदनशील केंद्र

विधानसभा निवडणुकांदरम्यान फाल्टा मतदारसंघ दुसऱ्या टप्प्यातील मतदानात संवेदनशील केंद्र ठरला होता. विविध मतदान केंद्रांवरून अनेक आरोप आणि घटना समोर आल्या होत्या. देबिपूर (बूथ क्रमांक १७७) येथे वाद अधिक वाढला, जिथे भाजपा उमेदवार देबांग्शु पांडा आणि अनेक मतदारांनी आरोप केला की इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवरील भाजपाच्या बटणावर पांढरी चिकटपट्टी लावण्यात आली होती, त्यामुळे मतदारांना पक्षाची निवड करता येत नव्हती.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका २३ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी दोन टप्प्यांत पार पडल्या. उर्वरित जागांची मतमोजणी ४ मे रोजी होणार आहे. फाल्टा हा डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे, जो तृणमूल खासदार अभिषेक बॅनर्जी यांचा बालेकिल्ला मानला जातो.

Exit mobile version