तृणमूलचा प्रवक्ताच म्हणतोय, कार्यकर्त्यांनी हिंदू महिलांवर अत्याचार केले!

निलंबित तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते रिजू दत्ता यांचा दावा

तृणमूलचा प्रवक्ताच म्हणतोय, कार्यकर्त्यांनी हिंदू महिलांवर अत्याचार केले!

निलंबित तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते रिजू दत्ता यांनी तृणमूलवर जोरदार हल्ला चढवला आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कशी जनतेची लूटमार केली यावर त्यांनी भाष्य करत टीका केली आहे. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांची दत्ता यांनी उघडपणे प्रशंसा केली. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हिंदू महिलांवर अत्याचार केल्याचा दावा दत्ता यांनी केला आहे. यामुळे त्यांच्या बदलत्या भुमिकेबद्दल चर्चा रंगली आहे. यापूर्वीही त्यांनी अधिकारी अजय पाल शर्मा यांना धमकी दिली होती. मात्र, निवडणूक निकालानंतर बिनशर्त माफी मागितली.

रिजू दत्ता यांनी दावा केला आहे की, तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इतकी वर्षे जनतेवर अत्याचार करून पैसे उकळले आहेत आणि त्याचाच राग म्हणून लोकांनी आता त्यांच्या विरोधात मत दिले. तसेच महिलांचा अपमान हा देखील एक मुद्दा आहे. राज्यातील महिला डोळे बंद करून ममता यांना मत देतील असे वाटत होते. पण तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी वर्षोनुवर्षे गावांमधील हिंदू महिलांवर अत्याचार केले आहेत. १५०० रुपयांमध्ये तुम्ही महिलांचा आत्मसन्मान खरेदी करू शकत नाही. त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराचा हा परिणाम आहे, असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, “६ मे रोजी रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली— या घटनेला अधिकारी यांनी बदला घेण्याचे आवाहन करून राजकीय तमाशा बनवले असते, ज्यामुळे किमान ५,००० तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला असता,” असा दावा दत्ता यांनी केला. त्यांनी अधिकारी यांच्या संयमाची आणि त्याऐवजी सर्वांना शांतता राखण्याचे आणि कायदा हातात न घेण्याचे आवाहन केल्याच्या वस्तुस्थितीची प्रशंसा केली.

हे ही वाचा:

शुभेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या करणारे तीन शूटर्स अटकेत

आयफोन 18 प्रो मॅक्स येतोय! काय असतील वैशिष्ट्ये?

हार्दिक पंड्याने इन्स्टाग्रामवर मुंबई इंडियन्सला केले अनफॉलो?

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती; सेन्सेक्स ९०० हून अधिक अंकांनी घसरला

रिजू दत्ता यांनी इंडियन पॉलिटिकल ॲक्शन कमिटी (आय-पॅक) घोटाळ्यावरही भाष्य केले. ज्यामुळे राज्यात पक्षाच्या प्रतिष्ठेवर परिणाम झाल्याचे म्हटले जाते. कोळसा घोटाळा प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीच्या संदर्भात अंमलबारी संचालनालयाने (ईडी) या सल्लागार कंपनीचे सह-संस्थापक प्रतीक जैन यांना अटक केली होती. पडद्याआड राहून पक्ष चालवणाऱ्या आय-पॅकने पक्ष उध्वस्त केला असून, आय-पॅकने केलेल्या या पक्षाच्या नासधुसीची जबाबदारी दीदी आणि अभिषेक दा यांना घ्यावी लागेल, असा आरोप त्यांनी केला आहे.

Exit mobile version