इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या इतिहासात आतापर्यंत १८ हंगाम पार पडले असून या काळात तब्बल ७ संघांनी ‘१०० विजयांचा’ टप्पा पार करत आपली ताकद सिद्ध केली आहे. चला, या दमदार संघांवर एक नजर टाकूया…
मुंबई इंडियन्स:
पाच वेळा विजेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्सने एकूण २७७ सामने खेळले आहेत. त्यापैकी १५१ विजय, १२२ पराभव झाले आहेत. ४ सामने टाय (२ टाय+विजय, २ टाय+पराभव) तर २ सामने निष्कर्षाविना राहिले.
चेन्नई सुपर किंग्स:
आणखी एक पाच वेळा चॅम्पियन असलेल्या चेन्नईने २००८ पासून आतापर्यंत २५३ सामने खेळले. त्यात १४२ विजय आणि १०८ पराभव नोंदवले. १ सामना टाय (टाय+पराभव) तर २ सामने निष्कर्षाविना राहिले.
कोलकाता नाइट रायडर्स:
तीन वेळा किताब जिंकलेल्या केकेआरने २६५ सामने खेळले असून १३५ विजय मिळवले आहेत. १२४ पराभव, ४ टाय (१ टाय+विजय, ३ टाय+पराभव) आणि २ सामने निष्कर्षाविना राहिले.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू:
मागील हंगामात विजेतेपदाचा दुष्काळ संपवणाऱ्या आरसीबीने २७१ सामने खेळले असून १३२ विजय मिळवले आहेत. तितकेच १३२ पराभव, ३ टाय (२ टाय+विजय, १ टाय+पराभव) आणि ४ सामने निष्कर्षाविना राहिले.
पंजाब किंग्स:
पंजाबने २६३ सामन्यांपैकी ११९ सामने जिंकले आहेत, तर १३९ पराभव पत्करले आहेत. ४ टाय (३ टाय+विजय, १ टाय+पराभव) आणि १ सामना निष्कर्षाविना राहिला.
दिल्ली कॅपिटल्स:
दिल्लीने २६६ सामने खेळून ११८ विजय मिळवले आहेत, तर १४० पराभव झाले. ५ टाय (४ टाय+विजय, १ टाय+पराभव) आणि ३ सामने निष्कर्षाविना राहिले.
राजस्थान रॉयल्स:
२००८ चा पहिला आयपीएल विजेता राजस्थानने २३६ सामने खेळले आहेत. त्यात ११४ विजय, ११५ पराभव, ४ टाय (२ टाय+विजय, २ टाय+पराभव) आणि ३ सामने निष्कर्षाविना राहिले.
आयपीएलच्या इतिहासात या ७ संघांनी ‘१०० विजयांचा’ टप्पा पार करत सातत्य, ताकद आणि स्पर्धात्मकता याचं उत्तम उदाहरण घालून दिलं आहे.
