पुरुषांनी इंग्लंडमध्ये हात टेकले, महिलांनी घडवला इतिहास

पहिल्याच प्रयत्नात मिळवला विजय, इंग्लंडला २७० धावानी हरवले

पुरुषांनी इंग्लंडमध्ये हात टेकले, महिलांनी घडवला इतिहास

लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघावर विजय मिळवला आहे. पुरुष संघाने लॉर्ड्सवर १९८६, २०१४ आणि २०२१ मध्ये तीन कसोटी सामने जिंकले आहेत. मात्र, महिला संघाने आपल्या पहिल्याच प्रयत्नात ही कामगिरी साधली. भारताने हा सामना २७० धावांनी जिंकला.

लॉर्ड्सवर दोन्ही संघ प्रथमच कसोटी सामना खेळले आणि भारतीय महिला संघाने इंग्लंडला त्यांच्याच भूमीवर पराभूत केले. भारताने इंग्लंडसमोर ४५६ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते, जे इंग्लिश संघ गाठू शकला नाही. महिला संघ या मैदानावर प्रथमच कसोटी सामना खेळत होता आणि भारताने तो जिंकला.

भारताने इंग्लंड महिला क्रिकेट संघासमोर ४५७ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. इंग्लंडचा संघ १८६ धावांवर सर्वबाद झाला आणि सामना हरला. दुसऱ्या डावात एमी जोन्स आणि सोफी एक्लेस्टोन यांनी अर्धशतके झळकावली, पण त्या संघाला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत. इंग्लंडच्या टॅमी ब्यूमोंट आणि हेदर नाईट यांचा हा शेवटचा कसोटी सामना होता आणि त्यामुळे त्यांना आपला शेवटचा सामनाही जिंकता आला नाही.

मंधाना आणि क्रांती गौड यांची अप्रतिम कामगिरी

इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २८५ धावा केल्या. स्मृती मंधानाने टीम इंडियासाठी शानदार खेळी करत ८३ धावा केल्या. हरमनप्रीत कौर (५८) आणि दीप्ती शर्मा (५७) यांनीही अर्धशतके झळकावली. भारताच्या २८५ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १७० धावांवर सर्वबाद झाला, त्यामुळे पाहुण्या संघाला पहिल्या डावात ११५ धावांची आघाडी मिळाली. क्रांती गौरने भारतासाठी डावाची सुरुवात करताना पाच बळी घेतले.

हे ही वाचा:

ट्रम्प, नेत्यानाहूंसह १३ नेत्यांचा इराण घेणार ‘बदला’

वनडेत हिशोब चुकता करणार टीम इंडिया?

भारतीय सैन्यात मोठा बदल, ‘थिएटर कमांड’ युग सुरू

अभिषेक बॅनर्जींच्या ‘सेबाश्रय’ आरोग्य शिबिरात उपचारानंतर पाय गमावला; गुन्हा दाखल

यास्तिका भाटियाने शतक झळकावले

पहिल्या डावात ११५ धावांची आघाडी घेतल्यानंतर, दुसऱ्या डावात भारतीय संघासाठी यास्तिका भाटियाने शतक झळकावले. तिने १५८ चेंडूंमध्ये ११३ धावा केल्या. स्मृती मंधाना (७०) आणि रिचा घोष (५०*) यांनीही अर्धशतके झळकावली. भारताने ३४१/७ धावांवर आपला डाव पूर्ण केला आणि इंग्लंडसमोर ४५७ धावांचे लक्ष्य ठेवले.

इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा दारुण पराभव

दुसऱ्या डावात इंग्लंड फलंदाजीतही अपयशी ठरले. त्यांचा संघ अवघ्या १८६ धावांवर सर्वबाद झाला, ज्यामुळे भारताने २७० धावांनी सामना जिंकला. भारताकडून स्नेह राणा ही सर्वोत्तम गोलंदाज ठरली, तिने चार बळी घेतले. सायली सातघरे, क्रांती गौर आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

Exit mobile version