हॉकी इंडियाने १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान जपानमध्ये होणाऱ्या २०व्या एशियन गेम्स (ऐची-नागोया २०२६) स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा केली. सलीमा टेटे हिच्याकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
नुकतेच एफआयएच नेशन्स कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या सलीमा टेटेवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सविता आणि बिचू देवी खारिबाम यांची गोलरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
मुख्य प्रशिक्षक शोर्ड मारिन यांनी निवडलेल्या २० सदस्यीय संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा योग्य समतोल साधल्याचे सांगितले. बचावफळीत सुशीला चानू, इशिका चौधरी, ज्योती, लालथंतलुआंगी आणि शिल्पी डबास यांना स्थान मिळाले आहे.
मधल्या फळीत सलीमा टेटे, निक्की प्रधान, साक्षी राणा, सुनेलिता टोप्पो, नेहा आणि दीपिका सोरेंग यांचा समावेश आहे. आक्रमण फळीत लालरेमसियामी, रुतुजा पिसल, नवनीत कौर, दीपिका, इशिका, बलजीत कौर आणि ब्युटी डुंगडुंग यांची निवड करण्यात आली आहे.
मारिन यांनी या संघाकडून एशियन गेम्समध्ये दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त करत खेळाडूंच्या फिटनेस आणि फॉर्मबाबत समाधान व्यक्त केले.
