जिम्बाब्वेसमोर टीम इंडिया भारी!

जिम्बाब्वेसमोर टीम इंडिया भारी!

२६ फेब्रुवारी रोजी टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या ‘सुपर-८’ फेरीत भारत आणि जिम्बाब्वे आमनेसामने येणार आहेत. सुपर-८ मधील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला असला, तरी जिम्बाब्वेविरुद्धचा भक्कम इतिहास भारतीय चाहत्यांसाठी दिलासादायक आहे.

एकूण आकडेवारी काय सांगते?

भारत आणि जिम्बाब्वे यांच्यात टी-२० फॉरमॅटमध्ये आतापर्यंत १३ सामने झाले आहेत. त्यापैकी:

टी-२० वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ केवळ एकदाच आमनेसामने आले असून तो सामना भारताने जिंकला आहे.

सुरुवात २०१० मध्ये, क्लीन स्वीपसह

दोन्ही देशांमधील पहिला टी-२० सामना १२ जून २०१० रोजी झाला. भारताने तो सामना ६ विकेट्सनी जिंकला.
यानंतर १३ जून २०१० रोजीच्या दुसऱ्या सामन्यातही भारताने ७ विकेट्सनी विजय मिळवत मालिका २-० ने जिंकली.

२०१५ मध्ये बरोबरी, २०१६ मध्ये मालिकेवर भारताची मोहोर

टी-२० वर्ल्ड कप २०२२ : मेलबर्नमध्ये भारताचा जलवा

टी-२० वर्ल्ड कप २०२२ मध्ये भारताने प्रथम फलंदाजी करत १८६/५ धावा केल्या.
यानंतर जिम्बाब्वेला केवळ ११५ धावांवर रोखत भारताने दमदार विजय मिळवला. हा सामना मेलबर्न येथे खेळला गेला होता.

जुलै २०२४ : ५ सामन्यांच्या मालिकेत ४-१ ने विजय

जुलै २०२४ मध्ये भारताने जिम्बाब्वेविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळली.

सुपर-८ आधी भारताची मानसिक आघाडी

इतिहास आणि आकडेवारी पाहता, जिम्बाब्वेविरुद्ध टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. सुपर-८ मधील पुढील सामन्यात भारत विजयाच्या लयीत परतणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version