AsiaCup T20 स्पर्धा ९ ते २८ सप्टेंबर दरम्यान यूएईमध्ये खेळवली जाणार

AsiaCup T20 स्पर्धा ९ ते २८ सप्टेंबर दरम्यान यूएईमध्ये खेळवली जाणार

AsiaCup T20 स्पर्धा ९ ते २८ सप्टेंबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी याची पुष्टी केली आहे.

२४ जुलै रोजी झालेल्या एसीसीच्या बैठकीत या ठिकाणाचा निर्णय घेण्यात आला. सर्व २५ सदस्य देशांनी बैठकीत भाग घेतला. ढाका येथे झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत भारताने व्हर्च्युअल पद्धतीने भाग घेतला.

बैठकीवरूनही बराच गोंधळ उडाला. एसीसीचे अध्यक्ष झाल्यानंतर नक्वी मनमानी करत होते. आणि बांगलादेशातील ढाका येथे होणाऱ्या बैठकीला कोणाला तरी पाठवण्यासाठी भारतावर दबाव आणत होते. पण बीसीसीआयने स्पष्ट केले होते की, ते ढाका येथे कोणताही अधिकारी पाठवणार नाही.

बीसीसीआय या स्पर्धेचे यजमान आहे. पण भारत आणि पाकिस्तानमधील सीमापार तणावामुळे ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये होत आहे. आणि दोन्ही देशांनी २०२७ पर्यंत फक्त तटस्थ ठिकाणी स्पर्धा करण्याचे मान्य केले आहे.

एसीसीने प्रसारकांशी केलेल्या करारानुसारभारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. आणि सुपर फोर टप्प्यात दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध आणखी एक संधी मिळू शकते. जर दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले तर तिसरा सामना होण्याची शक्यता आहे.

AsiaCup T20 2025 चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यासोबतच चाहत्यांची भारत-पाकिस्तान सामना पाहण्याची प्रतीक्षाही संपणार आहे. या स्पर्धेचे स्वरूप असे आहे की, दोन्ही संघ एकापेक्षा जास्त वेळा एकमेकांशी भिडू शकतात. आशिया कपचा हा १७ वा हंगाम असेल.

ही स्पर्धा पूर्वी फक्त एकदिवसीय स्वरूपात खेळवली जात होती. पण आता पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकाचे स्वरूप पाहून या स्पर्धेचे स्वरूप ठरवले जाते. पुढील वर्षी टी-२० विश्वचषक भारत आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे.

Exit mobile version