उत्तराखंडमधील केदारनाथ परिसरात रविवारी सकाळी एक दुर्दैवी हेलिकॉप्टर अपघात झाला. आर्यन एव्हिएशन कंपनीचे बेल 407 हेलिकॉप्टर (नोंदणी क्रमांक VT-BKA) या अपघातात कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये पाच प्रवासी, एक लहान मूल आणि चालक दलातील एक सदस्य होता. या प्रवाशांचा त्यात मृत्यू झाला.
नागरिक उड्डयन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरने सकाळी ५ वाजून १० मिनिटांनी वाजता गुप्तकाशी येथील आर्यन हेलीपॅडवरून उड्डाण घेतले होते आणि ५.१८ वाजता श्री केदारनाथ हेलीपॅडवर लँडिंग केले. त्यानंतर ५.१९ वाजता परत गुप्तकाशीसाठी उड्डाण घेतले, पण ५.३० ते ५.४५ दरम्यान गौरीकुंडजवळ अपघातग्रस्त झाले.
अपघाताचे संभाव्य कारण
तपास यंत्रणांच्या मते, खराब हवामान आणि ढगाळ वातावरण असूनही उड्डाण सुरू ठेवले गेले, ज्यामुळे हे “कंट्रोल्ड फ्लाइट इनटू टेरेन” (CFIT) प्रकरण ठरले. अपघाताचे नेमके कारण विमान दुर्घटना तपास संस्था (AAIB) यांच्याकडून तपासानंतरच स्पष्ट होईल.
तात्काळ प्रतिसाद व निर्णय:
-
एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम्सनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले.
-
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सकाळी ११ वाजता उच्चस्तरीय बैठक बोलावली.
हे ही वाचा:
दलितांचा अपमान करणे हा राजद व काँग्रेसचा नैतिक अधिकार
न थांबता, न झुकता, न डगमगता काम केलं
राजोरीमध्ये सीमेजवळ संशयास्पद हालचाली
‘इंसुलिन प्लांट’ मधुमेह रुग्णांसाठी खास मित्र
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय:
-
आर्यन एव्हिएशनच्या सर्व चारधाम यात्रा उड्डाणांवर तत्काळ बंदी.
-
ट्रांसभारत एव्हिएशनच्या दोन हेलिकॉप्टर (VT-TBC व VT-TBF) च्या पायलटांचे परवाने 6 महिन्यांसाठी निलंबित.
-
15 आणि 16 जूनला सर्व चार्टर व शटल हेलिकॉप्टर उड्डाणे स्थगित.
-
UCADA (उत्तराखंड सिव्हिल एव्हिएशन डेव्हलपमेंट अथॉरिटी) ला सर्व ऑपरेटर व पायलटांसोबत सुरक्षा प्रोटोकॉलची समीक्षा करण्याचे आदेश.
-
केदारनाथमध्ये एक ‘कमांड अॅण्ड कंट्रोल रूम’ स्थापन होणार – जी रिअल टाईम ऑपरेशन्सवर लक्ष ठेवेल आणि धोका ओळखून तत्काळ पावले उचरेल.
-
DGCA (नागरिक उड्डाण महासंचालनालय) ला केदारनाथ खोऱ्यात अधिकारी तैनात करण्याचे आदेश, जे उड्डाणांची नियमित तपासणी करतील.
सुरक्षेबाबत ठाम भूमिका:
नागरिक उड्डाण मंत्रालयाने स्पष्ट केले की विमान सुरक्षा ही कोणत्याही परिस्थितीत तडजोड करण्यासारखी नाही. सर्व हेलिकॉप्टर कंपन्यांना हवामान आणि इतर सुरक्षा नियमांचे कठोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. नियमभंग झाल्यास कठोर कारवाई केली जाईल.
