‘दिसताच गोळ्या घाला’

धुबरीमधील सांप्रदायिक तणावावर मुख्यमंत्री हिमंता सरमा यांचे पोलिसांना आदेश 

‘दिसताच गोळ्या घाला’
आसामच्या धुबरी येथे एका मंदिराबाहेर मांस फेकल्यानंतर जातीय तणाव निर्माण झाला आहे. या घटनेच्या विरोधात शहरात निदर्शने करण्यात आली आणि परिस्थिती इतकी बिकट झाली की परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री हिमंता सरमा यांनी मोठे वक्तव्य केले आहे. सांप्रदायिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर दिसताच गोळ्या झाडण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले आहेत.

 

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी समाजकंटकांवर दिसताच गोळीबार करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यांनी एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले, धुबरीमध्ये मंदिरांचे नुकसान करण्याच्या उद्देशाने एक जातीय गट सक्रिय झाला आहे. या संदर्भात दिसताच गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

धुबरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ते म्हणाले, “सांप्रदायिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मी पोलिसांना दिले आहेत. गरज पडल्यास रात्रीच्या वेळी ‘दिसताच गोळी मारण्याचा’ आदेश लागू केला जाईल, जेणेकरून शांतता राखली जाईल.”

बकरी ईदपासून धुबरीमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, “बकरी ईदच्या दुसऱ्या दिवशी काही उन्मादी घटकांनी हनुमान मंदिरासमोर एक कापलेले गायीचे डोके ठेवले होते. पहिल्या दिवशी दोन्ही समुदायातील लोकांनी आणि शांतता समितीने मिळून प्रकरण शांत केले, परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा मंदिराच्या परिसरात गायीचे डोके ठेवण्यात आले, ज्यामुळे परिस्थिती पुन्हा बिकट झाली. यानंतर दगडफेक झाली आणि काही पोस्टर्स देखील लावण्यात आले, ज्यामध्ये धुबरीला बांगलादेशचा भाग म्हणून दाखवण्यात आले होते. हे स्पष्टपणे सुनियोजित सांप्रदायिक चिथावणीचा प्रयत्न होता.”

हे ही वाचा : 

विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या परीचारीकेबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, सरकारी कर्मचारी निलंबित!

पंतप्रधान मोदींनी दिवंगत माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या कुटुंबाची घेतली भेट!

कानिफनाथ मंदिर, सारसबाग…नमाज, मजारमधून हिंदू संस्कृतीवर घाला

डाव्या विचारधारेतील आणखी एक ‘माफीवीर’

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्य सरकारने जिल्ह्यात रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) आणि CRPF ची अतिरिक्त तुकडी तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, प्रलंबित गुन्हेगारी प्रकरणांचा तपास जलद करून गुन्हेगारांना लवकरच अटक केली जाईल. हिमंता बिस्वा सरमा यांनी आरोप केला की धुबरीत एक नवीन ‘गोमांस माफिया नेटवर्क’ देखील सक्रिय आहे, ज्याने ईदपूर्वी हजारो गुरांची तस्करी केली. या नेटवर्कची चौकशी सुरू आहे आणि गुन्हेगारांना तुरुंगात पाठवले जाईल.

ते म्हणाले, “आम्ही कोणत्याही परिस्थितीत राज्यात सांप्रदायिक शांतता बिघडू देणार नाही. कायदा आणि सुव्यवस्था आमच्यासाठी सर्वोच्च आहे.” आसाम आणि बांगलादेशमधील अलिकडच्या राजकीय बदलांनंतर काही गट डिजिटल आणि जमिनीवर अस्थिरता पसरवण्याचे कट रचत आहेत. धुबरी घटना त्याचाच एक भाग आहे. मुख्यमंत्री सरमा असेही म्हणाले, “परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी गरज पडल्यास मी स्वतः रात्रभर हनुमान मंदिराजवळील परिसरात गस्त घालेन.” त्यांनी यावेळी स्पष्ट केले की या घटनेत सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही.

Exit mobile version