हिमाचल प्रदेशमध्ये बघा ढगफुटीने काय घडलं ?

हिमाचल प्रदेशमध्ये बघा ढगफुटीने काय घडलं ?

हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे भीषण हानी झाली आहे. राज्यातील विविध भागांत ढगफुटी आणि पावसामुळे प्रचंड भूस्खलन आणि अचानक पूर (फ्लॅश फ्लड) झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसानीचा सामना करावा लागत आहे. गेल्या २४ तासांहून अधिक काळापासून ३४ नागरिक बेपत्ता आहेत. बचाव पथकांनी बुधवारी दुसऱ्या दिवशी शोधमोहीम पुन्हा सुरू केली आहे.

सर्वाधिक नुकसान मंडी जिल्ह्यामध्ये झाले आहे. मंगळवारी या जिल्ह्यात १६ ठिकाणी ढगफुटी आणि ३ ठिकाणी अचानक पूर आल्याची नोंद झाली. यामध्ये एक पूल, २४ घरे आणि एक हायड्रो पॉवर प्रकल्प ध्वस्त झाला आहे. आतापर्यंत १० मृत्यूंची पुष्टी करण्यात आली आहे.

हेही वाचा..

सावधान ! मे महिन्यात मलेरियाचे ५ लाखांहून अधिक रुग्ण

कोविड लस आणि अचानक मृत्यू यामध्ये कोणताही संबंध नाही

बिहारमध्ये पुन्हा एनडीए सरकार बनेल!

टीएमसी नेत्यांचं मेंदू नीट काम करत नाही…

गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या या आपत्तीमुळे बेपत्ता नागरिकांचे जीव वाचण्याची शक्यता कमी होत चालली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. चंबा जिल्ह्यातून ३, हमीरपूर जिल्ह्यातून ५१ आणि मंडी जिल्ह्यातून ३१६ नागरिकांना आतापर्यंत सुरक्षितपणे वाचवले गेले आहे.

हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे की ७ जुलैपर्यंत संपूर्ण राज्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा इशारा आहे. २ ते ७ जुलै दरम्यानसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरच्या ताज्या बुलेटिननुसार, पंडोह धरणातून २ लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, ज्यामुळे पंडोह बाजार भागात पूराचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. यामुळे आसपासची घरे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तसेच मंडी जिल्ह्यातील ‘ज्यूनी खड्ड’ धोक्याच्या पातळीवरून वर वाहत आहे. त्यामुळे तेथून नागरिकांना तातडीने स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. राजस्व विभागाच्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशात किमान ४०६ रस्ते बंद झाले आहेत. त्यापैकी: मंडी – २४८, कांगडा – ५५, कुल्लू – ३७, शिमला – ३२, सिरमौर – २१, चंबा – ६, ऊना व सोलन – प्रत्येकी ४, हमीरपूर आणि किन्नौर – प्रत्येकी १ रस्ता.

Exit mobile version