मोदी-शहांची राष्ट्रपतींसोबत भेट, ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार?

राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा 

मोदी-शहांची राष्ट्रपतींसोबत भेट, ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार?

उद्या मंगळवार ५ ऑगस्ट रोजी काहीतरी मोठे होणार असल्याची चर्चा होत आहे. केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांच्या राष्ट्रपतींच्या भेटीने या चर्चेला आणखी जोर मिळाला आहे. राष्ट्रपतींसोबतच्या त्यांच्या संभाषणाचा तपशील सार्वजनिक करण्यात आला नाही, परंतु दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा लक्षात घेता ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. मागील इतिहास पाहिला तर मोदी सरकारने ५ ऑगस्ट रोजी दोन मोठे निर्णय घेतले होते. त्यामुळे उद्या देखील सरकार काहीतरी मोठे करणार असल्याचे म्हटले जात आहे.

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांच्या भेटीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या संदर्भात, राष्ट्रपती भवन किंवा पंतप्रधान कार्यालयाने भेटीच्या संदर्भाबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. अशा परिस्थितीत, पंतप्रधान मोदी-गृहमंत्री शहा आणि राष्ट्रपती यांच्यातील भेटीने राजकीय खळबळ वाढवली आहे.

सहसा जेव्हा पंतप्रधान आणि गृहमंत्री राष्ट्रपतींना भेटतात तेव्हा ती एकतर औपचारिक बैठक असते किंवा ते एखाद्या खास प्रसंगी एकत्र जातात. या दोन्ही नेत्यांनी एकाच दिवशी आणि काही तासांच्या फरकाने राष्ट्रपतींना भेटणे सामान्य नाही. राजकीय विश्लेषक आणि राजकारणावर लक्ष ठेवणाऱ्यांचा असा विश्वास आहे की सरकार मोठा निर्णय घेण्याचा किंवा पाऊल उचलण्याचा विचार करत आहे.

हे ही वाचा : 

एसआयआरवर लोकांना विरोधक गोंधळात टाकताहेत

लव्ह जिहादसाठी फंडिंग करणाऱ्या कादरीवर पोलिसांची नजर

मंत्री पद गेलं पण मुंडेंना बंगला काही सुटेना, दंडही गेला ४२ लाखांवर! 

इंडी आघाडी राम, सनातन आणि हिंदू विरोधी

५ ऑगस्ट रोजीचा इतिहास पाहिला तर मोदी सरकारने दोन मोठे निर्णय घेतले होते. ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीर मधील कलम-३७० आणि ३५ अ रद्द केले. तर ५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येमध्ये राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला. त्यामुळे आता ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी कोणता मोठा निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, ५ ऑगस्टचा मुहूर्त साधून पंतप्रधान मोदी समान नागरी कायदा (UCC) आणतील अशी चर्चा होत आहे. यासह पंतप्रधान मोदींच्या मंत्रीमंडळातही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अमेरिकेने  भारतावर लादलेल्या २५ टॅरिफवर पंतप्रधान मोदी बोलतील अशीही चर्चा आहे.

 

Exit mobile version