बेस्ट पतपेढी निवडणुकीत भारतीय जनता पार्टी प्रणीत पॅनल आणि शशांक राव यांच्या पॅनल ला मोठा विजय मिळाला आहे. गेल्या ९ वर्षांपासून वर्चस्व असलेल्या ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेल ला २१ पैकी एकही जागा जिंकता आली नाही. सर्वच्या सर्व जागा जिंकत भाजपाप्रणीत पॅनेल विजयी झाले. दरम्यान, एकत्रित आलेल्या ठाकरे बंधूना निवडणुकीत एकाही जागेवर यश न मिळाल्याने सत्ताधारी नेत्यांकडून जोरदार टीका आणि टिप्पणी होत आहे.
अशा परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ठाकरे बंधू एकत्र आले आहेत, ‘ब्रँड’ ठाकरे जिंकणार, पण लोकांना ते आवडलेले दिसत नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच याचे राजकीयकरण करायचे नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर बेस्टच्या झालेल्या निवडणुकीत त्यांचा दारूण पराभव झाला आहे आणि यावरून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे, असा प्रश्न विचारला असता. यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माझे असे मत होते कि अशा प्रकारच्या निवडणुकीचे राजकीयकरण करण्यात येवू नये, ही पतपेढीची निवडणूक आहे. पण त्यांनीच त्याचे राजकीयकरण केले. शशांक राव आणि प्रसाद लाडही आमचेच आहेत, मात्र आम्ही कधीही राजकीयकरण केले नाही.
हे ही वाचा :
भारताचे पर्यावरण संरक्षणात ऐतिहासिक पाऊल
११ वर्षांच्या मुलीला अॅमीबिक मेंनिंजायटिस
पाकिस्तानात अल्पसंख्यांकांची स्थिती बिकट
ईराणहून परतणाऱ्या ६४ स्थलांतरितांचा अपघातात मृत्यू
पण त्यांनी मात्र, आता दोन ठाकरे बंधू एकत्र-‘ब्रँड’ ठाकरे निवडून येणार, अशा प्रकारचं राजकीयकरण केलं. पण ते लोकांना काही आवडलेले दिसत नाही, असे दिसते. त्यांना एकही जागा मिळालेली नाही, यानिवडणुकी तरी त्यांना रिजेक्ट केल्याचे चित्र आहे. मला याचे काही राजकीयकरण करायचे नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
