23 C
Mumbai
Thursday, January 15, 2026
घरक्राईमनामामुंबईतून ७१९ बांगलादेशी नागरिकांची हकालपट्टी!

मुंबईतून ७१९ बांगलादेशी नागरिकांची हकालपट्टी!

२०२४ मध्ये वर्षभरात १५२ लोकांना केले होते हद्दपार

Google News Follow

Related

मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी गुरुवारी (७ ऑगस्ट) ११२ बांगलादेशी नागरिकांना बांगलादेशात पाठवण्यात आले आहे. यापैकी ९२ जणांना मुंबईतून आणि २० जणांना मीरा-भाईंदर आणि ठाणे येथून पकडण्यात आले होते. अहवालानुसार, या सर्वांना बुधवारी (६ ऑगस्ट) प्रथम पुण्यात नेण्यात आले आणि त्यानंतर गुरुवारी त्यांना भारती वायुदलाच्या (IAF) विशेष विमानाने आसाम-बांगलादेश सीमेवर नेण्यात आले, जिथे त्यांना बांगलादेश सीमा सुरक्षा दलाच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस अधिकाऱ्यानी सांगितले की, “यावेळी सरकारने बेकायदेशीर स्थलांतरितांना आसाम-बांगलादेश सीमेवर सोडण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यावर भारतीय सैन्याच्या कडक देखरेखीखाली आहे, ज्यामुळे त्यांची बेकायदेशीरपणे पुन्हा घुसखोरी जवळजवळ अशक्य आहे.”

माहितीनुसार या वर्षी १ जानेवारी ते ५ ऑगस्टपर्यंत एकट्या मुंबईतून ७१९ बांगलादेशी नागरिकांना हद्दपार करण्यात आले आहे, तर २०२४ मध्ये संपूर्ण वर्षभर ही संख्या मात्र १५२ होती. अधिकृत कागदपत्रांनुसार, ९२ पैकी ४० महिला, ३४ मुले आणि १८ पुरुष होते. यात मीरा-भाईंदर आणि ठाणे येथून अटक केलेल्या २० जणांची सविस्तर माहिती उपलब्ध नाही. एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले की, १९४६ च्या परदेशी नागरिक कायदा कलम ३(२)(क) अंतर्गत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सर्वांना हद्दपार करण्यात आले. या वर्षी फेब्रुवारीमध्ये पहिली हद्दपारी १२ जणांना बांग्लादेशात पाठवून झाली.

१६ जानेवारी रोजी अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरावर हल्ला करणाऱ्या बांगलादेशी नागरिक शरीफुल इस्लामच्या अटकेनंतर बांग्लादेशी नागरिकांच्या अटका आणि हद्दपारीला वेग आला. त्याच्याकडे बनावट आधार कार्ड आणि बेकायदेशीरपणे मिळवलेले भारतीय सिम कार्ड आढळले होते.

हे ही वाचा : 

मणिपूरच्या शेतकऱ्यांना सफरचंदामध्ये मिळतंय गोड यश!

पाककडून पुन्हा काश्मीरचा मुद्दा उपस्थित, म्हटले-अमेरिकेसह इतर देशाकडून मदत स्वागतार्ह!

रक्षाबंधनाच्या शुभ प्रसंगी समृद्ध भारत निर्माण करण्याची प्रतिज्ञा करू!

रशिया-युक्रेन युद्ध संपणार? ट्रम्प-पुतिन यांची भेटीची तारीख आली समोर!

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बांधकाम क्षेत्रात संशयास्पद लोक असल्याची माहिती खबऱ्यांनी दिल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. संशयितांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले आणि त्यांचे फोन रेकॉर्ड, बांगलादेशला झालेल्या कॉलचे पुरावे आणि संशयास्पद बँक व्यवहारांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर, अटक आणि हद्दपारीची प्रक्रिया पूर्ण झाली. माहितीनुसार, अंधेरीच्या अंबोली भागात सर्वाधिक ११ बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आले. किमान चार प्रकरणांमध्ये, फक्त माता त्यांच्या अल्पवयीन मुलांसह बेकायदेशीरपणे राहत होत्या.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा