25 C
Mumbai
Sunday, January 25, 2026
घरबिजनेसBudget 2022: ‘पुढच्या तीन वर्षात ४०० नव्या वंदे भारत रेल्वे’

Budget 2022: ‘पुढच्या तीन वर्षात ४०० नव्या वंदे भारत रेल्वे’

Google News Follow

Related

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष २०२२- २३ साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर करायला सुरुवात केली आहे. लोकसभेत हा अर्थसंकल्प सादर केला जात असून या बजेटमध्ये पुढच्या २५ वर्षांची ब्ल्यू प्रिंट असणार आहे, असे निर्मला सीतारमण यांनी सांगितले आहे. देशभरात रेल्वेचे जाळ अधिक मजबूत करण्यावर भर देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

शहरांमध्ये वाहतुकीसाठी महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या मेट्रोच्या विकासासाठी प्रयत्न करणार असून मेट्रोचे जाळे प्राधान्याने विकसित करणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. पुढच्या तीन वर्षात ४०० वंदे भारत रेल्वे सुरु होणार असल्याची महत्त्वाची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. सुरक्षा आणि क्षमता वाढीसाठी २ हजार किमी रेल्वे नेटवर्क जागतिक दर्जाचे स्वदेशी तंत्रज्ञान वापरून निर्माण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

Budget 2022: ‘६० लाख नवे रोजगार निर्माण करणार’

नवाब मलिकांवर सात दिवसात गुन्हा दाखल होणार

Budget 2022: आज सादर होणार अर्थसंकल्प; या क्षेत्रांना मिळू शकते प्राधान्य

Budget 2022: विकास दर ९.२%, महागाईत घट! काय सांगतो आर्थिक सर्वेक्षण अहवाल?

आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देत ६० लाख नवे रोजगार निर्माण करणार असल्याचेही अर्थमंत्र्यांनी सांगितले. सर्वसमावेशक विकास हेच सरकारचं ध्येय असेल, असं त्यांनी म्हटले. अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, भारत जगातील सर्वात वेगाने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. देशाला आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा