ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाककडून नियंत्रण रेषेवर गोळीबार; तीन नागरिकांचा मृत्यू

भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर

ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाककडून नियंत्रण रेषेवर गोळीबार; तीन नागरिकांचा मृत्यू

जम्मू- काश्मीरच्या पहगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ने चोख प्रत्युत्तर दिले आहे. या मोहिमेंतर्गत भारताने नऊ दहशतवादी अड्डे उध्वस्त केले आहेत. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान बिथरला असून त्यांच्या कुरापती अजूनही थांबलेल्या नाहीत. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर (एलओसी) गोळीबार केल्याचे समोर आले आहे. दुर्दैवाने यामध्ये तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय लष्करानेही पाकिस्तानच्या या कुरापती कारवायांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ज्यामध्ये पाकिस्तानी सैन्याचेही मोठं नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर (आयबी) पाकिस्तानी सैन्याने अंदाधुंद गोळीबार करून युद्धबंदीचे उल्लंघन केल्याने तीन निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. ६ मे आणि ७ मे रोजी रात्री पाकिस्तानी सैन्याने नागरी भागांवर अंदाधुंद गोळीबार केला तेव्हा ही घटना घडली. भारतीय सैन्याने म्हटले आहे की, त्यांनी पाकिस्तानच्या या कारवायांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

“६ मे आणि ७ मे २०२५ च्या रात्री, पाकिस्तानी सैन्याने जम्मू आणि काश्मीरच्या विरुद्ध असलेल्या नियंत्रण रेषेवरील आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील चौक्यांवरून अंदाधुंद गोळीबार केला. अंदाधुंद गोळीबारात तीन निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमावले. भारतीय सैन्य प्रमाणानुसार प्रत्युत्तर देत आहे,” असे लष्कराने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

हे ही वाचा:

ऑपरेशन सिंदूर: वायव्य भारतातील विमानतळे काही काळासाठी बंद

भारताचे ऑपरेशन सिंदूर सुरू, पाकव्याप्त काश्मिरातील ९ ठिकाणी भारतीय लष्कराने केला हल्ला

भारतासाठी असलेले पाणी भारतातच राहील, भारतच ते उपयोगात आणेल!

पाकिस्तानला आठवले मिया चन्नू…

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांना लक्ष्य करून अचूक हल्ला केल्यानंतर काही तासांतच हे युद्धबंदीचे उल्लंघन झाले. भारतीय सशस्त्र दलांनी एकूण नऊ दहशतवादी ठिकाणांवर यशस्वीरित्या हल्ला केला. ही कारवाई भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने संयुक्तपणे केली. भारतातील दहशतवादी कारवाया घडवून आणण्यात सहभागी असलेल्या जैश-ए-मोहम्मद (जेईएम) आणि लष्कर-ए-तोयबा (एलईटी) च्या प्रमुख दहशतवाद्यांना संपवण्यासाठी भारतीय सैन्याने हे लक्ष्य निवडले.

Exit mobile version