देशभरातील नागरिकांना आता भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपल्या मोबाईलवरूनही साजरा करता येणार आहे. भारत सरकार मार्फत यादृष्टीने आजादी का अमृत महोत्सव या नावाचे एक मोबाईल ॲप्लिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे हे ॲप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते शुक्रवार, १२ नोव्हेंबर रोजी हे ॲप्लिकेशन प्रसिद्ध केले गेले.
या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत होणाऱ्या सर्व कार्यक्रमांची माहिती असणार आहे. तर लहान मुलांसाठी एक विशेष विभाग या ॲप्लिकेशनमध्ये आहे. या विभागात भारताच्या युवा पिढीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात नोंदवलेल्या सहभागाचा तपशील पहायला मिळणार आहे. तर ‘अनसंग हिरोज’ नावाच्या विभागात अपरिचित क्रांतिकारकांच्या क्रांतीकथा वाचायला मिळतील.
हे ही वाचा:
मिलिंद तेलतुंबडे यमसदनी! गृहमंत्र्यांनी केले शिक्कामोर्तब
… म्हणून राजधानीत लागणार लॉकडाऊन
त्रिपुरात कोणत्याही मशीदिची तोडफोड, नुकसान झालेच नाही
‘…म्हणून उद्धव ठाकरे यांना रझा अकादमीच्या नेत्यांनी दिली होती फुले!’
या ॲप्लिकेशनमध्ये पंतप्रधान मोदींनी घोषणा केलेल्या तीन स्पर्धांविषयीही माहिती देण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी देशवासियांसाठी देशभक्तीपर गीत लेखन स्पर्धा, अंगाई गीत स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या विषयीही या ॲप्लिकेशन मध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
अँड्रोईड आणि आयओएस अशा दोन्ही प्रकारात हे ॲप्लिकेशन उपलब्ध असणार आहे. हे ॲप्लिकेशन ग्राहक मोफत डाऊनलोड करू शकतात. प्ले स्टोअर आणि ॲपल स्टोअरवर हे ॲप्लिकेशन उपलब्ध आहे.