बिहारमध्ये एनडीए १६० पेक्षा अधिक जागा जिंकणार!

गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला विश्वास

बिहारमध्ये एनडीए १६० पेक्षा अधिक जागा जिंकणार!

बिहारमध्ये गुरुवारी पहिल्या टप्प्याचे मतदान होत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एनडीए सरकारवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आणि आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल असा दावा केला.

“स्थिती अतिशय चांगली आहे. आम्ही आरामात जिंकू. आम्ही बिहारमध्ये १६० पेक्षा जास्त जागा जिंकू,” असे अमित शहा यांनी इंडिया टुडेला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.
त्यांनी पुढे सांगितले की, एनडीएला दोन-तृतीयांश बहुमत मिळेल, असा दृढ विश्वास आहे.

जेव्हा विचारण्यात आले की भाजप आणि जेडीयू दोन्ही पक्ष समान प्रमाणात कामगिरी करतील का, तेव्हा अमित शहा यांनी सांगितले की दोन्ही पक्षांची “स्ट्राइक रेट” किमान सारखीच असेल.

१ कोटी रोजगाराबाबत

एनडीएच्या १ कोटी रोजगाराच्या आश्वासनाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की रोजगार सरकारी, खाजगी आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून निर्माण केला जाईल. पुढील दोन वर्षांत त्याचे प्रमाण ठरवले जाईल.

त्यांनी म्हटले, गेल्या ११ वर्षांत आम्ही बिहारमधील सर्वात महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा मजबूत केल्या — रस्ते, पूल, वीज प्रकल्प. उद्योगांसाठी आवश्यक सुविधा मोदीनी तयार केली.”

बिहार आता देशातील इथेनॉल उत्पादनात पहिल्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी नमूद केले. बरौनीचा खत कारखाना सुरू झाला आहे, दोन मोठे वीज प्रकल्प उभारले जात आहेत, पीएम मित्रा टेक्स्टाइल पार्क येत आहे आणि 9 औद्योगिक वसाहती विकसित झाल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

महिलांना १० हजारांची मदत

महिलांना देण्यात येणाऱ्या १० हजार आर्थिक मदतीबाबत विरोधकांच्या “मतखरेदी”च्या आरोपांना उत्तर देताना शहा म्हणाले:

“ही मदत महिलांना सक्षम करण्यासाठी आहे. कोणीतरी शिवण मशीन घेतली, कोणीतरी बेकिंगसाठी उपकरणे घेतली. हा पैसा रोजगार निर्माण करण्यासाठी वापरला जातो.”

२५ महिलांनी मिळून २.५ लाख जमा केले तर त्या २० लाखांचा कर्ज प्रकल्प सुरू करू शकतात, असे त्यांनी सांगितले.

जंगलराज’वरील आरोप आणि आरजेडीवर निशाणा

भाजपा “जंगलराज”चा मुद्दा अतिशयोक्तीने मांडते, यावर शहा म्हणाले, तेजस्वी कोण? आजही लालू यादवच पक्ष चालवतात. त्यांची विचारसरणी तशीच आहे — लाठी, मसल पॉवर. जर ते पुन्हा सत्तेत आले तर जंगलराज परत येईल.”

हे ही वाचा:

फिटनेसप्रेमी मिलिंद सोमणचा हेल्थ मंत्र काय ?

‘ऑपरेशन खानपी’मध्ये चार उग्रवादी ठार

बद्धकोष्ठतेपासून डायबिटीजपर्यंत प्रत्येक आजारावर उपाय काय ?

मालवणीतील ढाकावर बुलडोजर फिरला; स्लम शेखला देवाभाऊंचा दणका

मोखामा प्रकरण

मोखामामध्ये जनसुराज समर्थक दुलार यादव यांच्या हत्येच्या प्रकरणावर ते म्हणाले, एका सुशासित राज्यात गुन्हा कधीच होणार नाही असे नाही. पण आरोपींना त्वरित तुरुंगात पाठवले गेले.”

शाह यांनी लालू यादवांचा उल्लेख करत सांगितले की ते केवळ आरोपी नसून शिक्षा झालेला गुन्हेगार आहे, आणि तरीही राहुल गांधी त्यांच्यासोबत उभे राहतात, अशी टीका त्यांनी केली.

बिहार निवडणुका वेळापत्रक

पहिला टप्पा: ६ नोव्हेंबर

दुसरा टप्पा: ११ नोव्हेंबर

निकाल: १४ नोव्हेंबर

 

Exit mobile version