भारतातील ‘तस्कर, दहशतवादी’ बांगलादेशींना रोखण्यासाठी ‘जमात’ उभारणार मानवी साखळी

बांगलादेशच्या सीमेवर होणार आंदोलन

भारतातील ‘तस्कर, दहशतवादी’ बांगलादेशींना रोखण्यासाठी ‘जमात’ उभारणार मानवी साखळी

बांगलादेशातील बांगलादेश जमात ए इस्लामी आणि त्याच्या इस्लामी तसेच इतर विरोधी पक्षांच्या आघाडीने भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोर बांगलादेशींना मायदेशात पाठविण्याची सुरू केलेली प्रक्रिया आणि सीमेजवळ बांगलादेशी नागरिकांच्या हत्या होत असल्याचा आरोप करत आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनाच्या कार्यक्रमाची माहिती शफीकुर रहमान यांच्या नेतृत्वाखालील जमात-ए-इस्लामीने दिली. ज्यामध्ये माजी शेख हसीना-विरोधी विद्यार्थी चळवळीमधून उदयास आलेल्या नॅशनल सिटीझन्स पार्टीचा (एनसीपी) समावेश आहे. घुसखोर, तस्कर, गुन्हेगारांना बांगलादेशात येऊ देऊ नका, म्हणून मानवी साखळी उभारा असे आवाहन या आंदोलनाच्या निमित्ताने जमातने केले आहे.

जमातच्या नेतृत्वाखालील ११ पक्षांच्या आघाडीने जाहीर केले की, ते शुक्रवार (१२ जून) रोजी बांगलादेशातील सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये आणि महत्त्वाच्या सीमा बिंदूंवर निषेध मोर्चे काढतील. त्यानंतर १५ जून रोजी ढाका येथे मोठी सभा आणि मोर्चा आयोजित करण्यात येईल. या आघाडीने पंतप्रधान तारीक रहमान यांच्या सरकारवर टीका करत भारतावर लोकांना जबरदस्तीने सीमापार पाठवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. तसेच भारताच्या बीएसएफकडून गोळीबार करून बांगलादेशी नागरिकांची हत्या करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

बांगलादेशी घुसखोरांना सीमेवरून त्यांच्या देशात ढकलण्यात येत असल्याचे आरोप भारताने सातत्याने फेटाळून लावले आहेत.केंद्र सरकारचे म्हणणे आहे की, केवळ बेकायदेशीर परदेशी नागरिकांची योग्य पडताळणी करून, कायदेशीर प्रक्रिया आणि द्विपक्षीय करारांनुसार त्यांना त्यांच्या देशात परत पाठवले जात आहे.

या इस्लामी पक्षांच्या प्रस्तावित आंदोलनामुळे हा मुद्दा केवळ राजनैतिक चर्चांपुरता मर्यादित न राहता रस्त्यावरही येण्याची शक्यता आहे. जमातने जारी केलेल्या निवेदनात, ज्यावर माजी खासदार हमीदुर रहमान आझाद यांची स्वाक्षरी आहे, म्हटले आहे, “१२ जून रोजी सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये निषेध सभा आयोजित केल्या जातील आणि त्यानंतर १५ जून रोजी ढाका येथे मोठा निषेध मोर्चा व सभा होईल.”

यापूर्वी, आझाद यांनी बांगलादेशचे गृहमंत्री सलाहुद्दीन अहमद यांच्या सीमाविषयक वक्तव्यांची तुलना “भारतीय मंत्र्यांशी” करत सरकार भारताबाबत खूपच मवाळ असल्याचा आरोप केला होता.

हे ही वाचा:

मोदी सरकारच्या १२ वर्षांत महिला सक्षमीकरणाला नवी दिशा

तृणमूलनेही अभिषेकवर फेकली अंडी

छट! ममता-काँग्रेस विलीनीकरण या केवळ अफवा

आकाशात झेपावला ‘आत्मनिर्भर भारता’चा नवा योद्धा

मे महिन्यात, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये भाजपच्या मोठ्या विजयांनंतर आणि भारताने बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवण्यावर भर दिल्यानंतर, ढाकाने आपल्या आंतरराष्ट्रीय सीमांवर उच्च सतर्कता लागू केली होती.

भारत सीमेजवळ आंदोलनाची घोषणा

बुधवारी ढाका येथील जमात-ए-इस्लामीच्या केंद्रीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत या आंदोलनाची घोषणा करण्यात आली. ११ पक्षीय आघाडीचे समन्वयक आणि जमात-ए-इस्लामीचे सहाय्यक सरचिटणीस हमीदुर रहमान आझाद यांनी सांगितले की, शुक्रवार (१२ जून) रोजी सर्व सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये आणि महत्त्वाच्या सीमा बिंदूंवर निषेध सभा घेतल्या जातील. त्यानंतर १५ जून रोजी राजधानी ढाका येथे मोठा मोर्चा आणि सभा होईल.

आझाद यांनी सांगितले की, या मोहिमेचा भाग म्हणून विविध जिल्ह्यांमध्ये परिसंवाद आणि ढाका येथे गोलमेज परिषदही आयोजित करण्यात येणार आहे.

“मानवी ढाल” उभारण्याची मागणी

याच पत्रकार परिषदेत एनसीपीचे मुख्य समन्वयक नासिरुद्दीन पटवारी यांनी सांगितले की, “झिरो लाईनजवळ राहणाऱ्या नागरिकांसमोर मानवीय संकट निर्माण झाले आहे.” सीमावर्ती भागातील लोकांनी “मानवी ढाल” उभी करावी, जेणेकरून “दहशतवादी, तस्कर किंवा गुन्हेगार” बांगलादेशात प्रवेश करू शकणार नाहीत, असे आवाहन केले.

बांगलादेशी वृत्तपत्रांतील अहवालांचा हवाला देत आझाद यांनी दावा केला की, गेल्या तीन महिन्यांत सीमेवर ५० हून अधिक कथित घटना घडल्या आहेत, ज्यात बांगलादेशात भारतातून लोकांना पाठविण्यात आले आहे.

Exit mobile version