जालंधर, अमृतसरमधील स्फोटांमागे भाजप; मुख्यमंत्री मान यांचा आरोप

सीमा सुरक्षा दल (BSF) संबंधित भागांच्या जवळ झाले स्फोट

जालंधर, अमृतसरमधील स्फोटांमागे भाजप; मुख्यमंत्री मान यांचा आरोप

पंजाबमधील जालंधर आणि अमृतसर येथे सीमा सुरक्षा दल (BSF) संबंधित भागांच्या जवळ झालेल्या दोन स्फोटांनंतर राज्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान, या घटनेवरून आम आदमी पक्ष राजकारण करत असल्याचे चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या स्फोटांबाबत भाजपवर गंभीर आरोप करत त्याचा संबंध आगामी निवडणुकांशी जोडला आहे.

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी बुधवारी (६ मे) म्हटले की, “जिथे-जिथे भाजप निवडणूक लढवू इच्छिते, तिथे अशा घटना घडतात.” त्यांनी आरोप केला की या घटना २०२७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग असू शकतात. भगवंत मान म्हणाले, “या छोट्या स्फोटांची चौकशी सुरू आहे. हे पंजाब निवडणुकीसाठी भाजपची तयारी आहे. भाजप लोकांमध्ये हिंसा आणि भीती निर्माण करून मते मिळवते. मी भाजपला सांगू इच्छितो की त्यांनी असे करणे थांबवावे. पंजाबचे लोक नेहमी शांतता पसंत करतात. भाजप जिथे निवडणूक लढवते, तिथे संघर्ष निर्माण करते.”

पहिला स्फोट जालंधरमध्ये झाला, जिथे BSF मुख्यालयाजवळ उभ्या असलेल्या एका स्कूटरमध्ये सायंकाळी सुमारे ८ वाजता स्फोट झाला. या स्फोटात एका डिलिव्हरी बॉय जखमी झाल्याची माहिती आहे. स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू आला आणि परिसरात गोंधळ उडाला. घटनेनंतर पोलीस, बॉम्ब निकामी पथक आणि फॉरेन्सिक टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि तपास सुरू करण्यात आला. परिसर सील करण्यात आला आहे.

या घटनेनंतर काही तासांतच अमृतसरमधील खासा परिसरात, जो एका लष्करी छावणीजवळ आहे, रात्री सुमारे १०:३० वाजता दुसरा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाजही दूरवर ऐकू आला आणि आसपासच्या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. सलग दोन स्फोटांनंतर पंजाब पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांनी तपास वेगात सुरू केला आहे. संपूर्ण राज्यात सुरक्षा कडक करण्यात आली असून संवेदनशील भागांमध्ये विशेष नजर ठेवली जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही घटनांच्या कारणांचा शोध घेण्यासाठी सर्व शक्य बाजूंनी तपास केला जात आहे.

हे ही वाचा:

दिल्ली ब्लास्ट प्रकरणात अडकवण्याची धमकी देत ४०.९० लाख लुटले

संदेशखालीमध्ये तृणमूल कार्यकर्त्यांचा केंद्रीय दलांसह पोलिसांवर गोळीबार

भाजपच्या विजयानंतर तीस्ता कराराचा लांबलेला प्रश्न सुटणार?

बंगालमधील सरकारी कर्मचारी भयमुक्त; दिल्या जय श्रीरामच्या घोषणा

सध्या हे स्पष्ट झालेले नाही की हे स्फोट अपघाती होते की कोणत्याही कटाचा भाग होते. दरम्यान, मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या आरोपांवर भाजपकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षेबाबत चिंता वाढली असून तपास यंत्रणा सर्व अंगांनी चौकशी करत आहेत.

Exit mobile version