23.2 C
Mumbai
Tuesday, January 20, 2026
घरराजकारणकृषिकायद्यांमध्ये हमीभाव काढण्याचा उल्लेख तरी कुठे? सर्वोच्च न्यायालयाचा काँग्रेसला सवाल

कृषिकायद्यांमध्ये हमीभाव काढण्याचा उल्लेख तरी कुठे? सर्वोच्च न्यायालयाचा काँग्रेसला सवाल

Google News Follow

Related

काँग्रेसचे खासदार टी. एन. प्रथापन यांना त्यांच्या याचिकेसंदर्भात हमीभावाविषयी सर्वोच्च न्यायालयाने थेट प्रश्न विचारला. न्यायालयाने प्रथापन यांना, शेतकऱ्यांना मिळत असलेला हमीभाव काढण्याची तरतूद नवीन कृषी कायद्यांमध्ये नेमकी कुठे आहे? असा सवाल केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वातील तीन सदस्यीय खंडपीठाने काँग्रेस खासदाराला हा सवाल केला आहे. प्रथापन यांनी न्यायालयात सादर केलेल्या याचिकेत, हमीभावाशिवाय शेती टिकणे अवघड आहे, असे लिहिले होते.

शेतकरी आंदोलनामध्ये नवीन कृषिकायदे मागे घेण्याची मागणी आहे. या मागणीमागे असलेले प्रमुख कारण हे या कायद्यांमुळे हमीभाव रद्द होईल असे सांगितले जात आहे. परंतु नवीन कृषिकायद्यांमध्ये हमीभाव काढण्याची कोणतीही तरतूद नाही. सरकारने अनेक वेळा विविध माध्यमांमधून हे स्पष्ट केले आहे की नवीन कायद्यांमध्ये हमीभाव रद्द करण्याची कोणतीही तरतूद नाही आणि हमीभाव काढण्याची सरकारची कोणतीही योजनाही नाही. सरकारने वारंवार ही स्पष्टोक्ती देऊनही आंदोलनकर्ते शेतकऱ्यांना भ्रमित करून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि डावे पक्ष या शेतकरी संगठनांना समर्थन देत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने नवे कृषी कायदे स्थगित करण्याचा निर्णय जानेवारीच्या सुरवातीला घेतला होता. परंतु आता सर्वोच्च न्यायालय या कायद्यातील तरतुदींवर याचिकाकर्त्यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारताना दिसून येत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा