24.5 C
Mumbai
Wednesday, January 21, 2026
घरराजकारणमेंदूला संसर्ग होण्यासाठी काँग्रेसचा नेता असणे पुरेसे असते

मेंदूला संसर्ग होण्यासाठी काँग्रेसचा नेता असणे पुरेसे असते

Google News Follow

Related

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंढरपुरातल्या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना कोरोना वाढीसाठी मोदी सरकारला जबाबदार धरले. त्यावरून पटोले यांच्या वर ट्वीटरद्वारे भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे.

काय घडले नेमके?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पंढरपुरात सभा झाली. त्यानंतर पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी बोलताना पटोले यांनी देशात कोरोनाचा संसर्ग वाढण्यासा मोदी सरकार जबाबदार आहे असे अजब तर्कट मांडले. त्याबरोबरच, सहा महिन्यांपूर्वीच राज्यात आणि देशात लसीकरण सुरू केलं असतं तर आजही ही परिस्थिती नसती उद्भवली असा हास्यास्पद दावा देखील त्यांनी केला.

हे ही वाचा:

रामायण पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबईत सॅनिटाझर यंत्रणा बसविण्यासाठी जनहित याचिका दाखल

राज ठाकरेंनी मानले मोदी सरकारचे आभार

टीपू सुलतान जयंती साजरी करणारी शिवसेना

यावरून भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी नाना पटोले यांना लक्ष्य केले आहे. त्यांनी ट्वीट करताना

मेंदूला संसर्ग होण्यासाठी कोरोना जबाबदार असण्याची आवश्यकता नाही, त्यासाठी काँग्रेस नेता असणे पुरेसे असते…

असे म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करताना नाना पटोले हे विसरले, की मुळात लस जानेवारी पासून उपलब्ध होऊ शकली होती. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी लसीकरण नेमके कसे करावे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा