31 C
Mumbai
Monday, February 16, 2026
घरस्पोर्ट्सपाकिस्तान संघातून सीनियर खेळाडूंना हाकला!

पाकिस्तान संघातून सीनियर खेळाडूंना हाकला!

भारताविरुद्ध पराभवानंतर आफ्रिदी संतापला

Google News Follow

Related

कोलंबोमध्ये भारताकडून झालेल्या दारुण पराभवानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानच्या वरिष्ठ क्रिकेटपटूंना लक्ष्य करत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. टी- २० विश्वचषकाच्या उर्वरित सामन्यांसाठी बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि शादाब खान यांना संघातून वगळण्याची मागणी त्याने केली आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार म्हणाला की, वारंवार होणाऱ्या अपयशांपासून पुढे जाण्याची आणि तरुणांना योग्य संधी देण्याची वेळ आली आहे.

भारताविरुद्ध पाकिस्तानच्या नुकत्याच झालेल्या पराभवामुळे टीकेला आणखी बळकटी मिळाली. आफ्रिदीने असा युक्तिवाद केला की, संघ परतावा न देता त्याच वरिष्ठ खेळाडूंवर अवलंबून राहू शकत नाही. एका पाकिस्तानी न्यूज शोमध्ये बोलताना आफ्रिदी म्हणाला की तो आगामी सामन्यांमध्ये तिन्ही खेळाडूंना वगळेल आणि ज्युनियर खेळाडूंना पाठिंबा देईल. “जर मला इथे निर्णय घ्यायचा असेल तर मी, शाहीनलाही बाहेर ठेवेन, बाबरलाही बाहेर ठेवेन आणि शादाबलाही संघाच्या बाहेर ठेवेन. मी नवीन मुलांना खेळवीन, तरुणांना संधी देईन. आणि नामिबियाविरुद्धच्या आमच्या सामन्यात, मी त्यांना पाठिंबा देईन, त्यांना आत्मविश्वास देईन आणि त्यांना संधी देत राहीन,” असे आफ्रिदी म्हणाला.

“आम्ही या खेळाडूंवर खूप दिवसांपासून लक्ष ठेवून आहोत- त्यांना संधी मिळत राहतात आणि प्रत्येक वेळी, आम्हाला अशी अपेक्षा आहे की अशा संघाविरुद्ध ते कामगिरी करतील. हे वरिष्ठ खेळाडू आहेत. जर ते तुमच्यासाठी कामगिरी करत नसतील, तर मग बेंचवर बसलेल्या ज्युनियर खेळाडूंना का खेळवू नये? असे आफ्रिदी म्हणाला.

हे ही वाचा:

एसआयआरमध्ये घोळ; बंगालमध्ये सात अधिकाऱ्यांना हाकलले

राफेलमध्ये वापरला जाणारा ‘हॅमर’ भारतात तयार होणार

सकाळच्या योगाभ्यासाला आलंय महत्त्व

राम मंदिराचे वैभव सातासमुद्रापार

कोलंबोमध्ये, विशेषतः भारताविरुद्ध, बाबर आझमचा संघर्ष सुरूच राहिला. १७६ धावांचा पाठलाग करताना, पाकिस्तानच्या आघाडीच्या फलंदाजाने अक्षर पटेलने बाद होण्यापूर्वी सात चेंडूत फक्त पाच धावा काढल्या. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करण्याची अपेक्षा असलेल्या शाहीन आफ्रिदीला वाईट कामगिरीचा सामना करावा लागला. पाकिस्तानने भारताची लय बिघडवण्याच्या प्रयत्नात तब्बल सात गोलंदाजांचा वापर केला, परंतु त्याचा सर्वात मोठा फटका त्यांच्याच आघाडीच्या वेगवान गोलंदाजाला बसला. शाहीन पाकिस्तानचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला, त्याने फक्त दोन षटकांत ३१ धावा दिल्या. शादाब खानचाही खेळ काहीसा बारा नव्हता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
292,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा