रोहित शर्माऐवजी वनडे संघाची सूत्रे आता शुभमन गिलकडे

भारत ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी केला बदल

रोहित शर्माऐवजी वनडे संघाची सूत्रे आता शुभमन गिलकडे

भारताला आता एकदिवसीय सामन्यांसाठी नवा कर्णधार मिळणार आहे. शुभमन गिलने रोहित शर्माची जागा घेत पुरुषांच्या ५० षटकांच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. हा निर्णय निवड समितीचे अध्यक्ष अजीत आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी अहमदाबादमध्ये झालेल्या निवड बैठकीत घेण्यात आला. गिल ऑस्ट्रेलियात १९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताचे नेतृत्व करणार आहे.

फेब्रुवारीत भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या रोहित शर्माचा या मालिकेसाठीच्या संघात समावेश करण्यात आला असून माजी कर्णधार विराट कोहलीलाही पुनरागमनाची संधी मिळाली आहे. दोघेही २०२५ च्या आयपीएल हंगामानंतर प्रथमच स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परत येणार आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची ही वनडे मालिका १९ ते २५ ऑक्टोबरदरम्यान खेळली जाईल. त्यानंतर २९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान पाच सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी श्रेयस अय्यरची नियुक्ती करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ:
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, के.एल. राहुल (यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), यशस्वी जायसवाल.

या वर्षाच्या सुरुवातीला गिलला कसोटी संघाचे नेतृत्व देण्यात आले होते. त्यानंतर आता त्याला सर्व स्वरूपातील संभाव्य भावी कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. आयपीएल हंगामादरम्यान रोहितने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर गिलला कसोटी कर्णधारपद मिळाले होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २-२ अशी बरोबरीत राखली, ज्यामुळे त्याने टीकाकारांना प्रभावी उत्तर दिले.

गिल नुकत्याच झालेल्या आशिया कपमध्ये सूर्यकुमार यादवचा उपकर्णधार होता.

रोहित शर्माकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संघाचे नेतृत्व अपेक्षित होते, परंतु मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांच्याशी चर्चेनंतर निवड समितीने ३८ वर्षीय रोहितला विश्रांती देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने सर्वांना धक्का बसला होता. आता हे दोघेही फक्त वनडे स्वरूपात सक्रिय आहेत; त्यांनी गेल्या वर्षी भारताच्या टी-२० विश्वचषक विजयानंतर टी-२० क्रिकेटलाही अलविदा केले आहे.

दौऱ्यापूर्वी रोहित आणि कोहली यांच्या फिटनेसबाबत शंका होती, पण दोघेही सरावात व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. रोहित मुंबईत अभिषेक नायर यांच्या मार्गदर्शनाखाली इनडोअर नेट सत्रांमध्ये सराव करत आहे, तर कोहली लंडनमध्ये प्रशिक्षण घेत आहे.

हे ही वाचा:

गाझा पट्टीत झालेल्या इस्रायली गोळीबारात सहा जणांचा मृत्यू

नामिबिया आणि झिम्बाब्वेची २०२६ टी२० विश्वचषकात धडक!

“झुबीन गर्ग यांना महोत्सव आयोजक आणि त्यांच्या व्यवस्थापकाने विष दिले!”

मटणाच्या रांगेत राहुल गांधींची शाकाहारावर चर्चा

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहितने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्याने विराट कोहलीसोबत दुबईत विजय साजरा करताना टीकाकारांना विनोदी पद्धतीने उत्तर दिले होते, “कोई फ्युचर प्लॅन नहीं है. जो चल रहा है वो चलेगा. मी या फॉरमॅटमधून निवृत्त होणार नाही. अफवा पसरू नयेत म्हणून हे स्पष्ट सांगतो.”

तथापि, इंग्लंड दौऱ्यापूर्वी दोघांनी कसोटीमधून निवृत्ती घेतल्यानंतर समीकरणे बदलली. आयपीएल हंगामादरम्यानच त्यांच्या निवृत्तीमुळे त्यांच्या आंतरराष्ट्रीय भविष्यासंदर्भात नवीन चर्चा सुरू झाली.

ऋषभ पंतचा समावेश नाही

दरम्यान, यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. इंग्लंड दौऱ्यात पायाच्या दुखापतीनंतर तो अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही.

Exit mobile version