देहरादूनमध्ये ६ बांगलादेशी नागरिकांना अटक

देहरादूनमध्ये ६ बांगलादेशी नागरिकांना अटक

उत्तराखंड पोलिसांनी सहा बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. अटकेतील व्यक्तींमध्ये चार पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. हे सर्वजण देहरादून आणि हरिद्वारमध्ये आपली खरी ओळख लपवून राहत होते. देहरादून जिल्ह्यातील क्लेमेंटटाऊन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. यामध्ये त्यांना मदत केल्याच्या आरोपाखाली एका भारतीय महिलेलाही अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या सर्व बांगलादेशी नागरिकांची चौकशी सध्या मिलिटरी इंटेलिजन्स आणि इंटेलिजन्स ब्युरो (IB) करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशी नागरिक मुनीर याने एका भारतीय महिलेशी विवाह केला आहे. तसेच, हरिद्वारमध्ये एका भारतीय पुरुषासोबत राहत असलेल्या बांगलादेशी महिलेलाही अटक करण्यात आली आहे. सर्व बांगलादेशी नागरिक आपली नावं व ओळख लपवून भारतात राहत होते. रिपोर्ट्सनुसार, मुनीर १४ वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमधील राधिकापूर सीमेवरून आपल्या मामा यांच्या घरात कल्याणगंज येथे आला होता. त्याने दोन वर्षं नोएडामध्ये काम केलं आणि त्यानंतर एका भारतीय महिलेशी विवाह केला. २०१६ मध्ये झज्जर येथील विटा भट्टीवर काम केलं आणि नंतर परत बांगलादेशात गेला. २०२३ मध्ये तो पुन्हा भारतात आला. दिल्लीच्या अशोकनगर येथे काही काळ वास्तव्य केल्यानंतर तो देहरादूनमध्ये राहू लागला.

हेही वाचा..

चारमिनारजवळ भीषण आगीत १७ जणांचा मृत्यू

देशहिताबाबत काँग्रेसला काही बोलताच येत नाही

प. बंगालात बनावट आधार रॅकेटचा पर्दाफाश

भारतविरुद्ध जाणे बांग्लादेशसाठी योग्य नाही

यापूर्वी कोटद्वार आणि रुडकी येथून देखील आपली ओळख लपवून राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी नागरिक आपली ओळख लपवून राहत आहेत. बिहार, बंगाल, दिल्ली, आसाम आणि इतर उत्तर-पूर्व राज्यांमध्ये त्यांची संख्या फार मोठी आहे. प्रत्येक राज्यात अवैधपणे राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध मोहीम राबवली जात आहे आणि त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. शनिवारी मथुरामध्येही विटा भट्ट्यांवर काम करणाऱ्या पुरुष, महिला आणि लहान मुलांसह सुमारे ९० बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं होतं.

Exit mobile version