23 C
Mumbai
Tuesday, December 30, 2025
घरविशेष८० टनाचं शिखर, पायाभरणीशिवाय हजार वर्षांहून अधिक जुने शिवमंदिर

८० टनाचं शिखर, पायाभरणीशिवाय हजार वर्षांहून अधिक जुने शिवमंदिर

Google News Follow

Related

श्रावण महिन्याच्या पवित्र काळात देशभरातील शिवमंदिरांत भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. तमिळनाडूमधील तंजावूर येथे स्थित बृहदेश्वर मंदिर हे केवळ भक्तीचं केंद्र नसून, त्याची अद्वितीय वास्तुकला आणि ऐतिहासिक महत्व यामुळे ते जगप्रसिद्ध आहे. हजार वर्षांहून अधिक जुने हे मंदिर चोल राजवंशाच्या वैभवाचे प्रतीक आहे. युनेस्कोने घोषित केलेल्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक असलेल्या या मंदिराच्या शिखरावर ८० टन वजनाचा ग्रॅनाईटचा घुमट आहे, जो कोणत्याही पायाभरणीशिवाय उभारलेला असून अनेक भूकंप सहन करूनही ताठ मानेने उभा आहे.

भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयानुसार, बृहदेश्वर मंदिराची रचना, शिलालेख आणि स्थापत्यकला यामुळे हे मंदिर अद्वितीय आहे. हे मंदिर केवळ धार्मिकदृष्ट्या नाही, तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही फार मोठं योगदान देतं. हे मंदिर ‘पेरुवुदैयार कोविल’ या नावानेही प्रसिद्ध आहे. द्रविड स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या मंदिराचं शिखर म्हणजे २०० फूट उंचीचं ‘विमान’ आहे, जे जगातील सर्वात उंच मंदिर शिखरांपैकी एक आहे. या शिखरावर ८० टन वजनाचा अखंड ग्रॅनाईट घुमट ठेवण्यात आला असून, तो इतक्या उंचीवर नेण्यासाठी चोल वास्तुविशारदांनी विशेष झुकाव असलेला रॅम्प तयार केला होता.

हेही वाचा..

चारधाम यात्रेत भाविकांनी रचला इतिहास

वायुदलातून निवृत्त होणार मिग-२१ फायटर जेट

आयुष्मान भारत योजनेमुळे रितेशला मिळाले नवे जीवन

अटॅक अपाचे हेलिकॉप्टर भारतात!

आश्चर्याची बाब म्हणजे तंजावूरमध्ये ग्रॅनाईटच्या खाणी नसताना संपूर्ण मंदिर ग्रॅनाईटच्या मोठमोठ्या खड्यांपासून बनवण्यात आलं आहे. इतिहासकारांच्या मते, सुमारे ३,००० हत्ती आणि शेकडो बैलांच्या मदतीने हे दगड दूरच्या खाणीतून नद्या व कालव्यांच्या मार्गाने आणले गेले होते. मंदिराच्या भिंतींवर चोल काळातील भित्तिचित्रं आणि शिलालेख कोरलेले आहेत, ज्यात त्या काळातील दैनंदिन जीवन, धार्मिक विधी, राजवाड्यातील समारंभ आणि भरतनाट्यमचे सुंदर दर्शन घडते. यातील शिलालेखांतून चोल राजवटीबाबत, त्यांच्या प्रशासन पद्धतीबाबत आणि लढायांबाबत माहिती मिळते.

चोल सम्राट राजराज पहिला, जे भगवान शंकराचे भक्त होते, १००४ इ.स.मध्ये या मंदिराची उभारणी सुरू केली होती. शिलालेखांनुसार, १०१० इ.स.मध्ये शिखरावर सुवर्ण कलश बसवण्यात आला – म्हणजे हे मंदिर केवळ ६ वर्षांत पूर्ण झालं. त्या काळात हे मंदिर केवळ पूजा स्थळ नव्हतं, तर सांस्कृतिक केंद्र होतं. संध्याकाळी येथे संगीतकारांच्या मैफिली आणि देवदासींच्या नृत्याचे कार्यक्रम होत. मंदिरात १६० दिवे व मशाली पेटवण्यात येत, ज्यासाठी २,८३२ गाई, १,६४४ मेंढ्या आणि ३० म्हशींकडून घी मिळवले जात असे. घी पुरवणाऱ्या गोठ्यांना जमीनही देण्यात आली होती.

मंदिराचा गर्भगृह, अर्धमंडप, महामंडप, मुखमंडप आणि नंदी मंदिर हे सर्व पूर्व-पश्चिम अक्षावर उभारलेले आहेत. संपूर्ण परिसरात गणेश, सुब्रह्मण्यम, बृहन्नायकी, चंडिकेश्वर आणि नटराज यांचे छोटे मंदिरही आहेत. विशाल द्वारपालांच्या मूर्ती चोल काळातील शिल्पकलेचं उत्तम उदाहरण आहेत. मंदिर दोन भिंतींच्या आवारात आहे, जिथे पूर्वेकडील गोपुरम (प्रवेशद्वार) प्रमुख आहेत. या गोपुरममध्ये भगवान शंकराच्या जीवनाशी संबंधित अनेक सुंदर नक्षीकाम पाहायला मिळते. गोपुरमजवळच दोन बलदंड द्वारपाल कोरलेले आहेत – हे पूर्णतः एका दगडातून बनवलेले आहेत.

मुखमंडप आणि महामंडप नंतर अर्धमंडपातून गर्भगृहात प्रवेश करता येतो. हे गर्भगृह दोन मजल्यांचं असून, यात एक प्रचंड शिवलिंग आहे – जे त्या काळातील सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एक मानलं जातं. हे गर्भगृह उंच चबुतऱ्यावर आहे आणि त्याची योजना चौकोनी आहे. याच्या सभोवताली परिक्रमा मार्गही आहे. १००० वर्षांनंतरही, हे मंदिर आजही ताठ मानेने उभं आहे. १९८७ साली युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा