31 C
Mumbai
Friday, December 12, 2025
घरविशेषयुद्धनौका, पाणबुडी निर्मिती हा भारताच्या बळकटीकरणाचा पुरावा

युद्धनौका, पाणबुडी निर्मिती हा भारताच्या बळकटीकरणाचा पुरावा

INS सुरत, INS नीलगिरी, INS वाघशीर राष्ट्रार्पण सोहळ्यानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईच्या नौदल गोदीत आयएनएस सूरत, आयएनएस नीलगिरी या युद्धनौका आणि आयएनएस वाघशीर ही पाणबुडी देशाला समर्पित करण्यात आली. यावेळी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय सुरक्षा वाढविण्यासाठी आणि या क्षेत्रातील आत्मनिर्भरता साध्य करण्याच्या केंद्र सरकारच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकला. तसेच त्यांनी म्हटले की, भारताचे लक्ष्य हे सशस्त्र दलाच्या आधुनिकीकरणावर आहे.

भारताच्या सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करणे आणि संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता प्राप्त करणे हे पंतप्रधानांचे प्राधान्य आहे. आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीरचे भारतीय नौदलात एकत्रितपणे कार्यान्वित होणे हे आपल्या संरक्षण क्षेत्राचे होत असलेल्या बळकटीकरणाचा उत्तम पुरावा आहे. भारतीय नौदलासाठी हा केवळ मैलाचा दगड नसून तुमच्या नेतृत्वाखाली हिंदी महासागर क्षेत्रात भारताच्या महत्त्वपूर्ण सामर्थ्याचे प्रदर्शन आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले.

हिंदी महासागर प्रदेश हा भारतासाठी नेहमीच धोरणात्मक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरला आहे. अटलांटिक महासागराला जे महत्त्व होते ते आता हिंदी महासागराला मिळू लागले आहे. जागतिक व्यापार आणि वाणिज्याचा मोठा कारभार याचं प्रदेशातून केला जातो. याव्यतिरिक्त, भौगोलिक कारणांमुळे हा प्रदेश वाढत्या आंतरराष्ट्रीय शक्ती प्रतिस्पर्ध्यांसाठी नैसर्गिक भाग बनत आहे. याबरोबरच, अंमली पदार्थांची तस्करी, अवैध मासेमारी, मानवी तस्करी आणि दहशतवादसुद्धा या भागात कायम आहे, असेही राजनाथ सिंह म्हणाले.

हे ही वाचा..

मुंबई बस अपघात : न्यायालयाने चालकाचा जामीन अर्ज फेटाळला

जसप्रीत बुमराह ठरला आयसीसीचा ‘प्लेअर ऑफ द मंथ डिसेंबर २०२४’

जम्मू-काश्मीर निवडणुका, अमरनाथ यात्रा सुधारित सुरक्षा परिस्थितीचा दाखला

INS सुरत, INS नीलगिरी, INS वाघशीर राष्ट्राला अर्पण!

राजनाथ सिंह म्हणाले की, “२,००० वर्षांपूर्वीचा रोमसोबतचा व्यापार असो किंवा आग्नेय आशियाई देशांसोबतचा व्यापार असो, आज भारताचा व्यापार ९५ टक्के या प्रदेशाशी जोडलेला आहे. अशा परिस्थितीत, हिंदी महासागर क्षेत्रात भारतीय नौदलाची मजबूत उपस्थिती हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आज या जहाजांचे कार्यान्वित होणे हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावरील एक महत्त्वाची उपलब्धी ठरेल,” असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे.

राजनाथ सिंह यांनी सांगितले की, INS सुरत आणि INS निलगिरी बनवण्यासाठी लागणारी ७५ टक्क्यांहून अधिक सामग्री ही भारतात विकसित केली गेली आहे. एकीकडे, देशांतर्गत मोठ्या संधींची निर्मिती करत असतानाच दुसरीकडे कमी किंमतीच्या आणि उच्च- प्रभावी प्रणालींवर देखील लक्ष केंद्रित करून आहोत जे सशस्त्र दलांना अल्पावधीत सक्षम बनवू शकतात, असंही ते म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा