26 C
Mumbai
Monday, March 16, 2026
घरविशेषकोरोना चाचण्यांच्या आकडेवारीचा फुगा फुटला

कोरोना चाचण्यांच्या आकडेवारीचा फुगा फुटला

Google News Follow

Related

मुख्यमंत्र्यांच्या अहंकाराचा परिणाम असल्याची भातखळकरांची टीका

गेले काही दिवस सातत्याने महाराष्ट्रामधील कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला असल्याचे सांगितले जात आहे. रुग्णवाढीची कमी झालेली टक्केवारीही कमी केलेल्या चाचण्यांचा परिणाम असल्याचा आरोप भाजपाकडून सातत्याने करण्यात आला होता. आता वृत्तपत्रांमधील वृत्तांत मुळेच हा फुगा फुटल्याचे समोर आले आहे. यावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

महाराष्ट्रामधील ३६ पैकी ५०% जिल्ह्यांमध्ये आवश्यक त्या चाचण्या होत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संसर्ग वाढीचा वेग अधिक असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. गेले काही दिवस महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्ण वाढीचे टक्केवारी ही कमी राहिली होती. राज्यातील सरासरी सुमारे बावीस टक्क्यांच्या आसपास अकरा मेपासून राहिली होती मात्र अहमदनगर बीड बुलढाणा परभणी सातारा सिंधुदुर्ग आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये दुखणं वाढीची टक्केवारी ३० टक्क्यांच्या आसपास होती. याच्या उलट सांगली जालना हिंगोली सह इतर दहा जिल्ह्यांमध्ये ही टक्केवारी २३ ते २७ टक्‍क्‍यांच्या आसपास होती.

हे ही वाचा:

मुंबईत आज-उद्या लसीकरण बंद ठेवून काय वीकेंड साजरा करायचा आहे का?

ठाकरे सरकारचे मंत्री फक्त बोलतात, आणि भरडली जाते जनता

आता तरी कोकणवासींना पुन्हा निसर्गाच्या हवाली सोडू नका

सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्यांचा माफीनामा

चाचण्या कमी केल्याने संसर्ग झालेल्यांची ओळख पटत नाही. त्यामुळे संसर्ग पसरण्याचा वेग वाढलेला राहतो. भाजपा यावरून सरकारवर सातत्याने टीका करत आला आहे. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी देखील यावरून ट्वीटरच्या माध्यमातून टीका केली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अहंकाराचाच हा परिणाम असल्याचे म्हटले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा